
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गाडे पाटीलांच्या घरी महाशिवरात्रीचा सण दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या पूजेची खास ओळख म्हणजे दरवर्षी नव्याने शंकराची पिंड तयार केली जाते. त्या पिंडीची विधीपूर्वक पूजा करून तिची घरात स्थापना केली जाते. यंदाही घरात उत्साह, श्रद्धा आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पवित्र दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र जमले असून सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि समाधान झळकत आहे.
Inspector Manju मध्ये नवा ट्विस्ट; सत्या–मंजूच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री!
यावर्षीच्या पूजेसाठी सिद्धू आणि भावना बसणार हे आधीच ठरलेले असते. ठरल्याप्रमाणे सिद्धू पिंड आणण्यासाठी बाहेर पडतो. मात्र, या दरम्यान निलांबरीने रचलेले कटकारस्थान मोठा अडथळा निर्माण करते. सिद्धूचा काही गुंडांसोबत सामना होतो आणि परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनते. या प्रसंगात एक थरारक फाइट रंगते. कुटुंबासाठी आणि परंपरेच्या मानासाठी सिद्धू धाडसाने लढतो. या संघर्षानंतर त्याचा दुग्धाभिषेक केला जातो, जो शुद्धीकरण आणि विजयाचे प्रतीक मानला जात आहे.
अखेर सर्व अडथळ्यांवर मात करत सिद्धू विधीपूर्वक पिंड घेऊन घरी परततो. घरातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत भक्तिभावाने पूजेला सुरुवात होते. मंत्रोच्चार, आरती आणि शंखनादाने घराचे वातावरण पूर्णपणे भक्तिमय बनते. दरम्यान, या विशेष सोहळ्यात जान्हवीची एन्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरते. ती सगळ्यांसमोर ठामपणे सांगते की काहीही झालं तरी ती जयंतकडे परत जाणार नाही. तिच्या या निर्णयामुळे घरातील वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण होते. जान्हवी गाणं सादर करत असताना सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात. ती सगळ्यांसमोर येताच घरातील सदस्यांना मोठा धक्का बसतो. भक्ती, परंपरा, संघर्ष आणि भावनिक नाट्य यांचा संगम असलेला हा महाशिवरात्री विशेष प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे.