
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकरांना घराघरात पोहोचवले आहे. या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता विराज जगताप याचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहेय. त्याचा अपघात 24 मार्चला बदलापूर भागातील आदर्श मंदिराजवळ घडल्याचे समोर आले आहे. या अपघातात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या मनगटावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे कळतंय. अभिनेता हा बदलापूर येथे वास्तव्यास आहे. विराज त्याच्या मित्राकडे कार्यक्रमासाठी गेला होतो. रात्री घरी परतत असताना हा भीषण अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विराज सुरक्षित असून या अपघातत त्याच्या हाताला जबर मार बसला आहे. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे. कार्यक्रमातून रात्री घरी परतत असताना त्याला गतीरोधकाचा अंदाज आला नाही. तसेच गतीरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने विराजचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याची गाडी घसरली.
काही दिवसांपूर्वी निखील बनेचाही अपघात झाल्याचं समोर आले होते. त्यानंतर आता अभिनेता विराज जगतापचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेबद्दल समजताच अभिनेत्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची नाराजी व्यक्क केली आहे. तसेच गतिरोधकांवर साधे पांढरे पट्टे रंगवण्यासाठीही पालिकेकडे निधी नाही का असा सवाल बदलापूरकरांनी उपस्थित केला आहे. ‘
बदलापूर शहरात एका बाजूला कोट्यवधींच्या विकासकामांसाठी भूमिपूजन आणि सुशोभीकरणाच्या घोषणा होत आहेत; मात्र दुसरीकडे मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था खूपच खराब आहे आणि गतिरोधकांची देखभालही नीट होत नाही. अनेक ठिकाणी नियमबाह्य आणि अनधिकृत गतिरोधक उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.