मालिकेच्या आगामी भागात, दीप आणि ज्योती यांच्यातील अनोखं नातं एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येईल. ज्योतीच रक्षण करण्यासाठी दीप चक्क वेशांतर करून, येणार आहे. दीपचे हे वागणे ज्योतीला बेजबाबदारपणाचे वाटून त्यांच्यात वादाची ठिणगी पडणार आहे. दुसरीकडे, स्वराज आणि प्रीतीच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच, ज्योती स्वराजची ‘वर चाचणी’ घेणार आहे. तर सुलू आत्या प्रीतीची ‘वधू चाचणी’ घेणार आहे. आता ही वधू वर चाचणी काय असेल हे बघणं औसुक्याच असणार आहे. तणावपूर्ण वातावरणात साखरपुड्याची बोलणी सुरू होणार आहेत. हा हाय-व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणारा ठरेल.
आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती फार राहिल्या नाहीत पण मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना एकत्र कुटुंब पाहण्याचा अनुभव मिळतो. सध्या मालिकेतील हे नवं वळण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Dipti Ketkar : अभिनेत्रीने शेअर केल्या आईसोबतच्या खास आठवणी! म्हणाली “अतिशय जवळची मैत्रीण…”
सध्या झी मराठीच्या सर्वच मालिका या टीआरपीच्या शर्यतीत टॉपला येत आहेत. कमळी, तारिणी, दीप ज्योती आणि सनई चौघडे या मालिकांनी कमी वेळातच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी कमळी मालिकेचा प्रोमो देखील टाईम्स स्वेअरवर दाखवण्यात आला होता. त्यामुळे सध्या या मालिकांची लोकप्रियता वाढत जात असल्याचं पाहायला मिळत आहे.






