
shashank ketkar
शशांक केतकरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने खुल्या गटाराचा प्रश्न मांडला. वर्दळीच्या ठिकाणी भर रस्त्यात खुल्या असलेलं गटार जीव घेणं असून देखील पुढाऱ्यांना याकडे साधं लक्ष ही देता येऊ नये याबाबतची खंत अभिनेत्याने व्यक्त केली आहे.
व्हिडीओ पोस्ट करत शशांक कॅप्शनमध्ये लिहितो की, हे कोणाच्याही विरोधात नाही किंवा support मध्ये नाही. ही आमची अडचण आहे आणि याचा त्रास आम्हाला होतोय.. मला तरी होतोय. आता ही गटाराची झाकणं कोणी सतत चोरतय की तुटतायत माहीत नाही .. पण काहीतरी करा !!!!!!!!!! कारण खड्यात एक भारतीय जाणार आहे !
एकंदर देशवासियांना त्रास २०१४ च्या आधी पण होता .. नंतरही आहे. पण तेव्हा लोकसंख्या 10 होती तर problem 1 होता . नंतर लोकसंख्या 100 झाली तेव्हा problems 10 झाले आणि आता लोकसंख्या 1000 आहे तर problems 100 झाले आहेत. त्यामुळे देशा समोरच्या वेग-वेगळ्या समस्या कायम आहेत त्या आहेतच. फक्त आता social media मुळे चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी वणव्या सारख्या पसरतात.विरोध करायचा म्हणून करू नका .. आणि support करायचा म्हणूनही करू नका … आपली बुद्धी, आणि देशाची प्रगती याला योग्य दिशेला न्या !पुन्हा तेच… तुमच्यावर विश्वास आहे पण…. असं शशांकने म्हटलंय.
व्हिडीओमध्ये शशांकने खुल्या गटाराचं देखील मनोगत व्यक्त केलं. पुढे त्याने असंही म्हटलं की, “एक दोन माणसांचा जीव गेला तरी काय फरक पडतो? असं त्याने लिहिलेल्या खड्यांचं मनोगतमध्ये म्हणाला. कॅप्शनमध्ये बीएमसी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना मेन्शन केला आहे. सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी देखील त्याला पाठींबा दिला आहे.