
tula japnar ahe
मिलिंद फाटक यांनी सांगितलं की, काही वर्षापूर्वी झी मराठीवर कुलवधू मालिका सुरु होती त्यावेळी मालिकेमध्ये लग्नाचा सीन शुट होणार होता. तेव्हा या सीनसाठी एक अभिनेते गुरुजी म्हणून आले होते. तेव्हा तिथे मधल्या वेळेत काही ते सगळ्यांचे हात बघत होते गंमत म्हणून मी ही हात दाखवला. माझा हात पाहिला तेव्हा ते म्हणाले की, अरे बापरे 2012 तुमचा शेवटचा काळ असणार आहे.
2012 मार्च हा काळ तुमच्यासाठी शेवटचे काही दिवस आहेत. एकतर तुम्ही मरणार तरी आहात किंवा तुम्हाला कोणताही मोठा पुरस्कार मिळणार आहे. तेव्हा 2012मध्ये मला काहीच नाही झालं पण मला दादासाहेब पुरस्कार मिळाला होता ते ही दिल्लीत. काही कारणांमुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही पण गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला. मिलिंद फाटक पुढे असंही म्हणाले की, सिनेमा जरी प्रदर्शित झाला नाही तरी कामाची दखल घेत माझं पुरस्कार देऊन कौतुक मात्र करण्यात आलं.
मिलिंद फाटक यांच्याबाबत सांगायचं तर मराठी नाटकं, मालिका आणि सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली.त्यांना अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. सध्या मिलिंद फाटक ‘तुला जपणार आहे’ मालिकेत अर्थव म्हणजे नीरज गोस्वामीच्या वडिलांची भुमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा देखील चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.