अरविंद केजरीवालांची मोदी सरकारवर कडकडून टीका (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
यावर प्रतिक्रिया देताना, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अहंकार संपुष्टात आला आहे. ते असेही म्हणाले की, मोदी सरकारसाठी आता उलट गिनती सुरू झाली आहे. केजरीवाल हे नेहमीच नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे राहिले आणि आता मोदी यांच्या सरकारवरही त्यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. याशिवाय भाजप अपयशी असल्याचेही म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या X अकाऊंटवर याबाबत ट्विट करत आपले मत व्यक्त केले.
पहा अरविंद केजरीवाल यांचे ट्विट
संसद में डिलिमिटेशन बिल फेल हुआ मोदी जी के अहंकार की हार हुई मोदी सरकार की उल्टी गिनती शुरू। — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 17, 2026
भाजप सपशेल अपयशी – संजय सिंह
दरम्यान, ‘आप’चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी एका वेगळ्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “परिसीमन विधेयक संसदेत फेटाळले गेले. मोदी आणि भाजपला ‘तुकडे-तुकडे गँग’प्रमाणे राज्यांची विभागणी करायची होती. संसदेत महिला आरक्षण विधेयक नव्हे, तर ‘जिताओ भाजप’ विधेयक मांडण्यात आले. भाजप आपल्या जागा वाढवण्याचा कट रचत होता, पण तो सपशेल अपयशी ठरला.”
Assam Election 2026 : आसामच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवालांची एन्ट्री; जाहीर केले 14 उमेदवार
उत्तर आणि दक्षिण यांच्यात संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न झाला होता – संजय सिंह
संजय सिंह पुढे म्हणाले, “उत्तर आणि दक्षिण यांच्यात संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न झाला होता, आणि विरोधी पक्षाने हे विधेयक नामंजूर करून तो प्रयत्न हाणून पाडला आहे. हे अजिबात महिला आरक्षण विधेयक नव्हते. २०२३ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकात म्हटले होते की, आधी जनगणना होईल, मग मतदारसंघ पुनर्रचना होईल आणि २०२९ नंतर विधेयकाची अंमलबजावणी केली जाईल. मग आम्ही म्हणालो, आज ५४३ पैकी ३३ टक्के महिला आरक्षण द्या आणि २०२४ मध्ये निवडणुका घ्या… तुम्ही बंगालमधील जागा कमी करत आहात, तुम्ही तामिळनाडूमधील जागा कमी करत आहात, तुम्ही ओडिशामधील जागा कमी करत आहात. हे करण्यापूर्वी तुम्ही कोणाला विचारत आहात?”






