Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मी राजीनामा का दिला…; अरविंद केजरीवाल स्पष्टच बोलले

या लोकांनी आमच्यावर पीएमएलए कलम लावले, त्यात जामीनही मिळत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, कारण ही केस खोटी बनावट आहे, हे त्यांना माहिती झाले, म्हणून न्यायालयाने आम्हाला बेल दिली. पण मी ठरवले होते. कोर्ट जोपर्यंत मला निर्दोष जाहीर करत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही,

  • By anuradha sagar
Updated On: Sep 22, 2024 | 01:31 PM
मी राजीनामा का दिला…; अरविंद केजरीवाल स्पष्टच बोलले
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: “या नेत्यांना (भाजपला) केसेस आणि खटल्यांची पर्वा नाही, त्यांची चामडी जाड आहे. पण मी तसा नाही. मी नेता नाही, माझी चामडी जाड नाही. मला चोर आणि भ्रष्टचारी म्हटले की मला फरक पडतो, म्हणूनच मी आज खूप दुखी आहे. माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. म्हणून मी राजीनामा दिला.” अशी प्रतिक्रीया आम आदमी पक्षाचे  अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. ते दिल्लील जंतरमंतर मैदानावर आयोजित ‘जनता की अदालत सभेत बोलत होते.

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची 13 सप्टेंबरला तिहार तुरुंगातून सुटका झाली. त्यांनी 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

हेही वाचा: बीडमध्ये अंबेजोगाई लातूर रोडवर भीषण अपघात; चार जण जागीच ठार

अरविंद केजरीवाल म्हणाले,“जर मी बेईमान झालो असतो, तर दिल्लीला मोफत वीज कशी दिली असती? वीज बिल मोफत देण्यासाठी 3,000 कोटी रुपये लागतात. जर मी बेईमान झालो असतो, तर दिल्लीला मोफत वीज कशी दिली असती, शिक्षण, आरोग्य आणि महिलांसाठी मोफत प्रवास या क्षेत्रात काम केले असते.  सर्व पैसे मी खाऊन टाकले असते. आज 22 राज्यात त्यांचे सरकार आहे, पण कोणत्या राज्यात वीज मोफत आहे. कोणत्या राज्यात महिलांचे प्रवासाचे भाडे फ्री आहे.  कुठेच नाही. मग चोर कोण आहे, आज तुम्हाला विचारायला आलो आहे, तुम्ही सांगा केजरीवाल चोर आहे की केजरावालला तुरुंगात पाठवणारे  चोर आहेत, असा सावलहीत त्यांनी उपस्थित केला.

मी माझ्या आयुष्यात फक्त आदर आणि प्रामाणिकपणा कमावला आहे.   माझ्या पक्षाच्या बँकेत कोणतेही पैसे नाहीत. मी फक्त आदर कमावला आहे. 10 वर्षांनंतर मी सीएम पदाचा राजीनामा दिला आहे. काही काळानंतर मी मुख्यमंत्री निवास देखील सोडेन. आज माझ्याकडे दिल्लीत राहण्यासाठी घरही नाही. पण नवरात्रीच्या दरम्यान मी मुख्यमंत्री निवासस्थान सोडेल,  असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा: बारामतीतल्या बॅनर्सची पुन्हा चर्चा; सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार फिक्स आमदार

या लोकांनी आमच्यावर पीएमएलए कलम लावले, त्यात जामीनही मिळत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, कारण ही केस खोटी बनावट आहे, हे त्यांना माहिती झाले, म्हणून न्यायालयाने आम्हाला बेल दिली. पण मी ठरवले होते. कोर्ट जोपर्यंत मला निर्दोष जाहीर करत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही, असं मी ठरवलं होतं. त्यामुळे मी जनतेच्या कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. मी अशा डागासोबत जगूही शकत नाही आणिमरूही शकत नाहीत मी जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय़ घेतला.

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या योजनांनुसार अरविंद केजरीवाल सर्व 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये जनता अदालत स्थापन करणार आहेत. आम आदमी पार्टीचे सरकार हे प्रामाणिक सरकार आहे की नाही, आम्ही प्रामाणिक आहोत की नाही, असे प्रश्न आम्ही थेट जनतेच्या कोर्टात विचारू, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.

हेही वाचा: सुईमध्ये धागा ओवण्यात तुम्हालाही अडचण येते का? जाणून घ्या सोप्या टिप्स

Web Title: Arvind kenjriwal gave his reason for resigning nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • arvind kejariwal
  • BJP

संबंधित बातम्या

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
1

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Sangli Politics: संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द, मुंबईकडे रवाना झालेले कार्यकर्ते परतले; नेमकं कारण काय?
2

Sangli Politics: संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द, मुंबईकडे रवाना झालेले कार्यकर्ते परतले; नेमकं कारण काय?

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
3

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

होय, खरे गद्दार उद्धव ठाकरेच; शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचा गंभीर आरोप
4

होय, खरे गद्दार उद्धव ठाकरेच; शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.