
Sanjay Raut, BJP, Politics, Lok Sabha Election, National News,
“अब अच्छे दिन आयेंगे! या अच्छेवाले पुराने दिन वापस आयेंगे! मोदी शहा जायेंगे! जरूर जायेंगे! असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी ‘पोल ट्रॅकर’च्या सर्वेक्षणाचे विश्लेषण करणारा व्हिडीओही शेअर केला आहे.
‘पोल ट्रॅकर’ने ‘मूड ऑफ इंडिया’ या नावाने नुकतेच एक सर्वेक्षण केल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणाची सॅम्पल साईझ 4 लाख 53 हजार इतकी असल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोल ट्रॅकरच्या सर्वेक्षणात, सध्याच्या घडीला लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपप्रणित एनडीए आघाडीला राम मंदिरातील कथित दान चोरी घोटाळा आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्ज यांमुळे मोठा फटका बसू शकतो.
Poll Tracker Survey OF MOOD OF INDIA 2026 ⚫️ सबसे लोकप्रिय youth leader ? ▪️ नरेन्द्र मोदी — 36%
▪️ राहुल गाँधी — 58%
▪️अन्य — 06%#MoodOfIndia2026 #PollTracker #OpinionSurvey #PublicOpinion pic.twitter.com/zupMdTl5GV — Poll Tracker (@PollTracker) August 10, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे सलग 12 वर्षे सत्तेत असूनही भाजपला आतापर्यंत अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरचा मोठा फटका बसलेला नव्हता. मात्र, राम मंदिर आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे मोदींची जादू फिकी पडण्याची शक्यता या सर्वेक्षणातून वर्तविण्यात आली आहे.
‘पोल ट्रॅकर’कडून देशातील 3 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत 543 लोकसभा मतदारसंघांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीत अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान चोरी घोटाळा आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचे मुद्दे चांगलेच चर्चेत होते.
सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास इंडिया आघाडीला 44 टक्के मते मिळू शकतात आणि 280 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, भाजपप्रणित एनडीएला 40 टक्के मते मिळून त्यांच्या जागांचा आकडा 240 पर्यंत खाली येऊ शकतो.
तर इतर पक्षांना 16 टक्के मते मिळण्याचा आणि लोकसभेच्या 23 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाच्या दाव्यांवरून संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी-शाह यांच्या नेतृत्वावर निशाणा साधला असून, या आकडेवारीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
‘पोल ट्रॅकर’च्या या ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील नागरिकांनी देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांच्या नावाला ५८ टक्के पसंती दिली आहे. सर्वेक्षणात 43 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामावर समाधान व्यक्त केलं आहे. तर 47 टक्के लोकांनी असमाधान व्यक्त केले आहे. यासोबतच सर्वेक्षणातील ५८ टक्के लोक एनडीए सरकारच्या कामकाजावर नाराज असल्याचेा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.
तर दुसरीकडे या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 61 टक्के लोकांनी लोकसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांच्या कामावर समाधानी असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांच्या चांगल्या भविष्यासाठी देशाचा भावी नेता म्हणून राहुल गांधी यांच्या नावाला 69 टक्के लोकांनी पसंती दिली आहे, तर नरेंद्र मोदींच्या नावाला केवळ 23 टक्के तर पसंती देण्यात आली आहे.
अब अच्छे दिन आयेंगे!
या
अच्छेवाले पुराने दिन वापस आयेंगे!
मोदी शहा जायेंगे!
जरूर जायेंगे! https://t.co/2e8g5Eu0E4 — Sanjay Raut (@rautsanjay61) August 12, 2026