एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी (फोटो- istockphoto)
जयपूर: देशभरात अफवांचे जाळे फोफावताना दिसत आहे. शाळा, हॉस्पिटल्स आणि विमाने आशा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाली. जयपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली. त्यामुळे एकच गदारोळ उडाला. जयपूर विमानतळावर अशी धमकी येणाची ही दूरी वेळ आहे असे समजते आहे. याधीही एकदा बॉम्बची धमकी प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे. एअर इंडियाचे आयएक्स १८९ विमानाला मेलवरून बॉम्ब उडवण्याची धमकी प्राप्त झाली आहे. यामुळे विमानतळावर एकच गडबड झालेली पाहायला मिळाली.
एअर इंडियाचे आयएक्स १९६ विमानाला मेलवरून बॉम्ब उडवण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर या विमानाचे जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमरजन्सी लॅंडींग करण्यात आले. रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास या विमानाचे लॅंडींग करण्यात आले. या विमानातून १८९ प्रवासी प्रवास करत होते. बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त होताच विमानतळ सुरक्षा प्राधिकरणाने या विमानाची कसून तपासणी केली. तपासणी दरम्यान या विमानात संशयास्पद काही आढळून आले नाही. त्यानंतर पहाटे ५ वाजता टेक ऑफसाठी परवानगी देण्यात आली. या घटनेमुळे ४० विमानांचे उड्डाण यावर परिणाम झाला.
गेल्या काही दिवसांत घटनांमध्ये वाढ
एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली. त्यानंतर अयोध्येत हाय अलर्ट देण्यात आला आहे. विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या या ठिकाणी धमकी प्राप्त झालेल्या विमानाचे इमरजन्सी लॅडींग करण्यात आले होते. एअर इंडियाच्या या विमानातून १३९ प्रवासी प्रवास करत होते. या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर या विमानाचे इमरजन्सी लॅंडींग करण्यात आले आहे. विमानांची सुरक्षा यंत्रणेकडून तपासणी केली जात आहे. या विमानाने जयपूर विमानतळावरून उड्डाण केल्याचे माहिती समोर आली आहे. दरम्यान बॉम्बने उडवून देण्याची धमकी केवळ अफवा असल्याचे देखील म्हटले जात आहे.
बईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानालाही धोका
याआधी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानालाही बॉम्बची धमकी मिळाली होती. यानंतर विमान दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आले. सध्या शोध सुरू आहे. त्यानंतर विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा विमानाची कसून चौकशी करण्यात आली होती. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बचा धोका लक्षात घेऊन दिल्लीकडे वळवण्यात आले होते.