
Congress leader Mohsina Kidwai Passes away at 94 age in noida marathi news
माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवाई या मागील काही काळापासून वयोमानानुसार होणाऱ्या आजारांनी त्रस्त होत्या. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. मोहसिना किदवाई यांच्या कुटुंबीयांनी आणि जावई, राझी उर रहमान किदवाई यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, बुधवारी पहाटे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात मोहसिना किडवाई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय राजकीय वर्तुळात, विशेषतः काँग्रेस पक्षात, शोक पसरला आहे.
मोहसिना किदवाई यांच्या कुटुंबियांनी कळवले आहे की, त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील निझामुद्दीन स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येतील.
हे देखील वाचा : तर TMC खासदार टक्कल करणार..; डेरेक ओब्रायन यांचे भाजपला ‘ओपन चॅलेंज
एक प्रभावी राजकीय प्रवास
मोहसिना किदवाई या भारतीय राजकारण आणि काँग्रेस पक्षातील एक अत्यंत आदरणीय आणि प्रमुख व्यक्तिमत्व राहिल्या आहेत.त्यांची राजकीय कारकीर्द दीर्घ आणि गौरवशाली राहिली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या मोहसिना किदवाई यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री म्हणून अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. त्या उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघातून सहाव्या लोकसभेवर निवडून आल्या आणि सातव्या व आठव्या लोकसभेतही त्यांनी तीच जागा सांभाळली. किदवाई यांनी मेरठमधून तीन वेळा खासदार म्हणून काम केले. त्यांनी २००४ ते २०१६ या काळात छत्तीसगडमधून राज्यसभेच्या सदस्य म्हणूनही काम केले.
हे देखील वाचा : स्त्री ‘अस्पृश्य’ असू शकत नाही! सबरीमाला प्रकरणी न्यायमूर्तीचे मासिक पाळीबद्दल स्पष्ट मत, महिलांच्या अधिकारांवर केली जोरदार चर्चा
मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला शोक
माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवाई यांच्या निधनावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, “काँग्रेस पक्षाचा एक भक्कम आधारस्तंभ आणि माजी केंद्रीय मंत्री, ज्यांनी आपल्या आयुष्यातील सहा दशकांहून अधिक काळ राष्ट्रसेवेसाठी समर्पित केला, अशा श्रीमती मोहसिना किदवाई जी यांच्या निधनाने मी अत्यंत दुःखी झालो आहे. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये दीर्घकाळ खासदार म्हणून कार्यरत राहिलेल्या आणि अनेक वर्षे काँग्रेस कार्यसमितीच्या सन्माननीय सदस्या असलेल्या त्यांनी, पक्षाच्या अत्यंत कठीण काळातही एक मार्गदर्शक शक्ती म्हणून भूमिका बजावली. त्यांचे निधन ही काँग्रेस पक्षाची आणि देशाची एक मोठी हानी आहे, “अशा भावना मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केल्या आहेत.