Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…तर मोहन भागवतांना अटक करण्यात आली असती”; राहुल गांधी नेमकं म्हणाले तरी काय?

कॉंग्रेस पक्षाचे दिल्लीतील मध्यवर्ती कार्यालय बदलण्यात आले आहे. या नवीन इंदिरा भवन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 15, 2025 | 05:37 PM
congress rahul gandhi target rss mohan bhagwat

congress rahul gandhi target rss mohan bhagwat

Follow Us
Follow Us:

दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसने नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. कॉंग्रेसने आपले नवीन मुख्यालय उभारले आहे. कॉंग्रेसच्या या नवीन कार्यालयाचे नाव इंदिरा भवन असे असणार आहे. खासदार सोनिया गांधी यांच्या हस्ते या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांनी इंदिरा भवनच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये संवाद साधला. यावेळी राहुल गांधी राज्यातील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा देखील उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता ठेवा. पारदर्शकपणे मतदान होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही जी माहिती आयोगाकडे मागितली ती त्यांनी दिली नाही, असे मत खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

पुढे राहुल गांधी आरएसएसचे संचालक मोहन भागवत यांच्या राम मंदिर उद्घाटनावेळी स्वातंत्र्य मिळाले असल्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, “मोहन भागवत सार्वजनिकपणे असं वक्तव्य करतात. जर दुसऱ्या एखाद्या देशात त्यांनी असं वक्तव्य केलं असतं तर त्यांना अटक झाली असती. तसंच त्यांच्यावर खटला भरवला गेला असता. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही असं म्हणणं हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. हा अपमान मोहन भागवत यांनी केला आहे. आता ही वेळ आली आहे की मोहन भागवत जी वायफळ बडबड करतात ती आपण ऐकणं बंद केलं पाहिजे. कारण आता लोकांना कळलं आहे की एकच एक वक्तव्य हे लोक अशाच प्रकारे बोलत राहतील आणि तेच खरं आहे असं ओरडत राहतील,” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

दिल्ली विधानसभा निवडणूकसंबंधी बातम्या वाचा

राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्ष भाजप तपासयंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, “आपल्या देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे. कारण ईडी, सीबीआय यांना एकच काम दिलं जातं ते म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांना घेरा आणि त्यांना तुरुंगात धाडा. तसंच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही निवडणुकीची आम्ही मागतो आहोत ती माहिती दिली पाहिजे अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली.

Web Title: Congress rahul gandhi target rss mohan bhagwat for india independence after ram temple inauguration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • Congress
  • mohan bhagwat
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Kangana Ranaut: ‘राहुल गांधींची अवस्था त्या अस्वस्थ मांजरासारखी’; संसदेतील गदारोळावरून कंगना राणौत यांचा विरोधकावर घणाघात
1

Kangana Ranaut: ‘राहुल गांधींची अवस्था त्या अस्वस्थ मांजरासारखी’; संसदेतील गदारोळावरून कंगना राणौत यांचा विरोधकावर घणाघात

‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा शेवट नाही’; विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच – नसीम खान
2

‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा शेवट नाही’; विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच – नसीम खान

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड
3

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड

घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषांचा सहभागही वाढला पाहिजे : मोहन भागवत
4

घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषांचा सहभागही वाढला पाहिजे : मोहन भागवत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.