
शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हानं (फोटो सौजन्य - iStock)
२०२५-२६ या कालावधील भारतातील तांदळाचे सरासरी उत्पादन प्रतिहेक्टर ४ हजार ३९० किलोग्रॅमपर्यंत पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला गेला आहे. परंतु स्थानिक पातळीवरील अडचणींमुळे सर्व भागांतील उत्पादनात एकसमानता नसल्याने खरे आव्हान समोर उभे राहते. किडींच्या प्रादुर्भावामुळे पुरेसे भाताचे उत्पादन मिळत नाही. यामुळे पिकांचे उत्पादन घटते. शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते. गोदरेज अग्रोव्हेटचे पीक संरक्षण व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.के.राजावेलू यांनी तांदूळ उत्पादक शेतक-यांसमोरील किडीसंबंधी चार प्रमुख आव्हानांवर माहिती दिली आहे ती जाणून घेऊया.
‘या’ 4 रंगाचे तांदूळ ठरतात आरोग्यदायी, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
१. सहज लक्षात न येणा-या किडींचा धोका
तांदूळ उत्पादनात पान गुंडाळणारी अळी आणि खोडकिडा या सर्वाधिक नुकसान करणा-या किडी असल्याचे शेतकरी सांगतात. रोपांची लागवड झाल्यानंतर साधारणतः दोन ते चार आठवड्यांनी खोडकिड्याचा प्रादुर्भाव सुरु होतो. ही कीड खोडाच्या आत शिरते. त्यामुळे सुरुवातीला या किडीचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. पिके कोमेजू लागल्यानंतर किंवा डेड हार्टचे लक्षण आढळल्यानंतर किड लागल्याचे कळते.
तांदूळ पिकाला ही कीड लागल्यास ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. याच कालावधील पान गुंडाळणा-या अळीचाही प्रादुर्भाव वाढतो. ही अळी पान गुंडाळून हरितद्रव्याच्या कार्यात बाधा आणते. परिणामी, प्रकाश संश्लेषण खंडित झाल्याने पिकांची वाढ खुंटते. ही कीड सुरुवातीला दिसून येत नाही. त्यामुळे वेळेत नियंत्रित करणे कठीण होऊन जाते. या किडीचा आटोक्याबाहेर प्रादुर्भाव दिसून आल्यास २० ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. अनेकदा मोठे नुकसान झाल्यानंतर दोन्ही किडींचा प्रादुर्भाव लक्षात येतो. त्यामुळे शेतक-यांना योग्य वेळी उपाययोजना करणे कठीण होऊन जाते.
२. पिकाच्या वाढीच्या काळातच किडींचा वाढता प्रादुर्भाव
तांदळाचे पीक वाढत असतानाच किडींचा प्रादुर्भाव होत असतो. सुरुवातीच्या काळात खोडकिडा पिकाचे नुकसान करतो. हे नुकसान तातडीने लक्षात येत नाही. लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांच्या कालावधीत फुटवे येण्याच्या आणि कणसे धरण्याच्या टप्प्यावर खोडकिडा आणि पान गुंडाळणारी अळी या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव वाढतो. तांदूळ शेतीसाठी आवश्यक असलेले उष्ण-दमट आणि पाणथळ वातावरण या किडींच्या वाढीस पोषक ठरते. त्यामुळे वर्षभर किडींचा धोका कायम राहतो. विविध टप्प्यांवर सतत होणा-या प्रादुर्भावामुळे शेतक-यांना त्वरित उपाययोजना करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी, पिकांचे नुकसान होते.
३. पीक संरक्षण योजनेतील मर्यादा
बाजारात उपलब्ध कीटकनाशके किडींपासून पूर्णपणे संरक्षण देत नाही, अशी खंत शेतकरी वर्गाने व्यक्त केली. या कीटकनाशक औषधांचा प्रभाव फार काळ न राहणे, औषधांचा परिणाम अपेक्षित काळात न दिसणे, वारंवार फवारणी यांमुळे शेतक-यांच्या खर्चात वाढ होते, शिवाय या कामात जास्त काल लक्ष केंद्रित करावे लागतात.
७७ टक्के भात उत्पादक शेतकरी किडींवर जलद नियंत्रण उपायांना दिर्घकाळ संरक्षण पुरवणा-या उपायांना प्राधान्य देत असल्याचे गोदरेज अग्रोव्हेटच्या सर्वेक्षणात दिसून आले. शेतक-यांना कमी हस्तक्षेपात परिणामकारक आणि विश्वासार्ह कीड नियंत्रणांच्या उपायांची गरज असल्याचे या सर्व्हेक्षणात अधोरेखित करण्यात आले.
४. तांदळाच्या वाढत्या शेतीमुळे प्रभावी कीड नियंत्रणाची गरज
देशात तांदळाला चांगला बाजारभाव मिळतो. या पिकाची मागणीही वाढत असल्याने येत्या काळात तांदळाचे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. मात्र वाढत्या लागवडी क्षेत्रासह किडींचा प्रादुर्भावही वाढण्याची भीती आहे. तांदळाच्या पिकाला कमी किड लागली तरीही त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रचंड आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतक-यांना मोठ्या शेतजमिनीवर प्रभावीपणे काम करणारे आणि योग्य वेळी वापरल्यावर पिकांचे संरक्षण करणारे कीड नियंत्रण उपाययोजना गरजेची आहे. यामुळे नुकसान टाळता येईल, अशी विश्वासार्ह यंत्रणा असावी याकडे त्यांचा कटाक्ष आहे.
भातशेतीचा विस्तार होत असला तरीही दर्जेदार उत्पादनाच्या निर्मितीत किडींचे संकट हे मोठे आव्हान आहे. अशा वेळी शेतक-यांना जलद, कार्यक्षम आणि पिकाच्या महत्त्वाच्या टप्प्यात संरक्षण देणा-या साधनांची गरज आहे. आता ‘गोदरेज अग्रोव्हेट टकाइस’ हे नवे उत्पादन या समस्येवर रामबाण उपाय ठरु लागले आहेत. हे उत्पादन किडींवरव तत्काळ नियंत्रण मिळवून देते. दीर्घकाळ संरक्षण देते. शिवाय शेतीपिकांचा दर्जाही अबाधित राहतो.