युद्धबंदी कराराबाबत काय म्हणाले विक्रम मेस्त्रीं
India-Pakistan ceasefire: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पकिस्तानच्या सर्व सीमारेषांवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येत होता. ७ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ले केले. पाकिस्तानच्या आवाहनानंतर, काल संध्याकाळी (१० मे ) दोन्ही देशांमध्ये पु्न्हा युद्धबंदी करार झाला, परंतु शेजारी देशाने पुन्हा त्याचे उल्लंघन केले. काल रात्री ८ वाजताच्या सुमारास जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन दिसले आणि स्फोटांचे आवाजही ऐकू आले. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली.
पाकिस्तानच्या हल्ल्यांबाबत बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, ‘ आज संध्याकाळी (१० मे) भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये झालेल्या कराराचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. हे आज झालेल्या युद्धबंदी कराराचे उल्लंघन आहे. भारतीय लष्कर या उल्लंघनांना पुरेसा आणि योग्य प्रतिसाद देत आहे आणि आम्ही या उल्लंघनांना खूप गांभीर्याने घेत आहोत. आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की त्यांनी युद्धबंदी उल्लंघनांना तोंड देण्यासाठी योग्य पावले उचलावीत आणि ही परिस्थित गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळावी. भारतीय लष्करदेखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच नियंत्रण रेषेवर सीमा उल्लंघनाच्या कोणताही प्रकार घडल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जावे, असे निर्देश सैन्याला देण्यात आले आहेत. धन्यवाद.
जगातील युद्ध काही संपेना! इस्रायल-हमास युद्ध सुरुच; गाझावरील हल्ल्यात 23 पॅलेस्टिनींचा मृत्यू
दरम्यान, भारत-पाकिस्तानात झालेल्या युद्धबंदीच्या करारानंतर विक्रम मिस्री यांनी काल संध्याकाळी (१० मे) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “पाकिस्तानच्या डीजीएमओने आज भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओंना फोन केला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती करण्यात आली आणि दोन्ही देशांतील ,सैन्यालाही तशा सुचना देण्यात आल्या. यानंतर सोमवारी (१२ मे) दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करणार आहेत.
विक्रम मिस्री यांच्या वक्तव्याच्या काही मिनिटे आधी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ वर पोस्ट करून भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराची घोषणा केली. “अमेरिकेच्या मदतीने दीर्घ वाटाघाटींनंतर, भारत आणि पाकिस्तानने ताबडतोब युद्धबंदीवर सहमती दर्शविली. दोन्ही देशांनी शहाणपण दाखवल्याबद्दल अभिनंदन आणि लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.” असं लिहीत त्यांनी दोन्ही देशांचे आभारही मानले.
India-Pakistan Conflict: तुम्ही X वर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंहला फॉलो करताय का? थांबा, वाचा का