
Middle east war
El Nino : भारतावर महासंकट! नासाच्या सॅटेलाईटने टिपलं प्रशांत महासागरातील El Nino चे भयानक दृश्य
भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, ‘एल निनो’च्या स्थितीमुळे यावर्षी भारतातील मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण गेल्या ११ वर्षांतील नीचांकी पातळीवर जाऊ शकते. हवामानतज्ज्ञांनी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे, याचा परिणाम ऊस लागवडीवर आणि पर्यायाने साखर उत्पादनावर होऊ शकतो.
ऊसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज, इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे निर्माण झालेली पुरवठ्याची कमतरता आणि देशांतर्गत साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्याच्या गरजेमुळे निर्यात बंदी लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत साखर निर्यातीवर निर्बंध घातले होते.
ब्राझीलनंतर भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा साखर निर्यातदार देश आहे. अहवालांनुसार, २०२२-२३ पर्यंतच्या पाच हंगामांमध्ये भारताने सरासरी ६.८ दशलक्ष मेट्रिक टन साखरेची निर्यात केली, जी जागतिक निर्यातीच्या सुमारे १० टक्के इतकी होती. % इतकी होती.
यावर्षी, सुमारे ८,००,००० टन निर्यात झाल्यानंतर सरकारने ही संनी मानली भारत अमिराती (यूएई), इराक, सौदी अरेबिया आणि सोमालिया यांसारख्या देशांना मोठ्या प्रमाणावर साखरेची निर्यात करतो. भारताच्या या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय बाजारावर विपरित परिणाम होऊ शकतो.
सध्याच्या हंगामासाठी साखर उत्पादनाचा अंदाज सुरुवातीला ३०.९५ दशलक्ष टन वर्तवण्यात आला होता. मात्र आता उत्पादन २७.९ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. हा आकडा वार्षिक वापराच्या (सुमारे २८.५ दशलक्ष टन) तुलनेत कमी आहे. १ ऑक्टोबर रोजी हंगाम सुरू होत असताना, कारखान्यांकडील साखरेचा साठा सुमारे ३.५ दशलक्ष टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. जी गेल्या तीन दशकांतील सर्वांत कमी पातळी असेल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, २०१५ मध्ये ‘एल निनो ‘मुळे पडलेल्या दुष्काळामुळे ऊस लागवडीत घट झाली होती. त्यानंतर, देशाने २०१६-१७ आणि २०१७-१८ या कालावधीत साखरेची आयात केली होती. त्यापूर्वी, २००९ आणि २०१० मध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर केलेली साखर आयात जागतिक किमतीत जवळपास तिप्पट वाढ होण्यास कारणीभूत ठरली होती. अहवालांनुसार, इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा पुरवठा वळवला गेल्यामुळे आता भारताला साखर आयात करणे भाग पडत आहे.