India-China Relations : भारत-चीन संबंधांमध्ये नवा अध्याय? अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा (फोटो सौजन्य: एक्स)
या बैठकीत दोन्ही देशांमध्ये परस्पर विश्वास आणि परस्पर संबंध प्रस्थापित करण्यास मदतीचे आश्वासन देण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर या संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंध आणि सुधारणांचा आढावा घेण्यात आला. सध्या दोन्ही देश राजनैतिक आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने पाऊल टाकत आहे.
२०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकामकीनंतर दोन्ही देशांतील संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यानंतर चार वर्षाहून अधिक काळ नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यात तणाव कायम होता. मात्र, गेल्या दीड वर्षात भारत आणि चीन संबंध पुन्हा सुरळित करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. सीमेवर शांतता राखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये दोन्ही देशांनी लढाखमधील नियंत्रण रेषेवरुन आपापले सैन्य माघारी घेण्याचा निर्णय झाला.
सद्य परिस्थिती दोन्ही देशांमधील संबंध सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. दोन्ही देशांत सुरु असलेल्या राजनैतिक संवादामुळे सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होत आहे. नुकत्याच झालेल्या अजित डोवाल (Ajit Doval) आणि वांग यी यांच्या भेटीनंतर संबंध अधिक दृढ होती असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
NSA Ajit Doval, KC met Member of the CPC Political Bureau and FM of China, Wang Yi on 22 June 2026 on the sidelines of the BRICS NSAs’ Meeting in New Delhi. The two sides reviewed recent developments in bilateral relations and noted progress towards gradual normalisation. NSA… pic.twitter.com/B3WMVRcMBd — Randhir Jaiswal (@MEAIndia) June 22, 2026






