
इंडिगो विमानाचे इंजिन हवेतच बंद पडले अन् 224 प्रवासी ...; इंजिनमध्ये बिघाड
विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच चेन्नई विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आली. हे विमान रात्री 11:30 वाजता चेन्नई विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते. मात्र लँडिंगच्या तयारीदरम्यान डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे पायलटला समजले.
Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…
पायलटने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एटीसीला माहिती दिली. त्यानंतर विमानाने रात्री 11:37 वाजता रनवे क्रमांक 25 वर सुरक्षित लँडिंग केली. विमानातील सर्व 224 जण सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विमान सुरक्षितपणे उतरल्याने मोठा अनर्थ टळला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रात्री 11:47 वाजता ‘फुल इमर्जन्सी’ हटवण्यात आली. विमानतळावरील इतर कामकाजावर या घटनेचा मोठा परिणाम झाला नाही आणि सर्व सेवा सामान्यपणे सुरू राहिल्या.
इंडिगोच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर विमान सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हवेत तीव्र टर्बुलन्सचा सामना करावा लागला होता. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर झालेल्या तपासात पायलटच्या वैद्यकीय/ड्रग टेस्टशी संबंधित गंभीर बाब समोर आल्याचे वृत्त आहे. अहवालानुसार संबंधित पायलटने गांजाचे सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, दोन्ही पायलट्सना तपास पूर्ण होईपर्यंत उड्डाणाच्या ड्युटीपासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, एअर इंडियाच्या सुरक्षाविषयक बाबींवर मंगळवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) महासंचालक वीर विक्रम यादव आणि Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) चे महासंचालक जी.व्ही.जी. युगंधर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एअर इंडियाच्या बाजूने टाटा समूहाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच एअर इंडियाचे फ्लाइट सेफ्टी प्रमुखही बैठकीत सहभागी झाले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ४ ऑगस्ट रोजी घडलेल्या फुकेत-दिल्ली विमानाच्या घटनेबाबत एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी बोलावले होते. या घटनेत एअर इंडियाच्या A320neo विमानाचा समावेश होता. विमान थायलंडमधील फुकेत येथून दिल्लीकडे येत होते. एकीकडे चेन्नई विमानतळावर इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊनही विमान सुरक्षित उतरले, तर दुसरीकडे एअर इंडियाच्या अलीकडील टर्बुलन्स घटनेमुळे विमान कंपन्यांच्या फ्लाइट सेफ्टी प्रोटोकॉलवर प्रशासनाचे लक्ष अधिक केंद्रित झाले आहे.
Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणजे ‘बिघडलेले शहजादे’! गृहमंत्री संसदेत येताच…; भाजप खासदाराचा घणाघात