
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी अपडेट; केरळमध्ये प्रवेश लांबला, ‘या’ तारखेला होऊ शकते दमदार सुरुवात,काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज?
सामान्यतः मान्सूनचा भारतातील प्रवेश केरळमार्गे होतो आणि त्यानंतर तो हळूहळू देशाच्या विविध भागांमध्ये पुढे सरकतो. मात्र यावेळी वातावरणातील बदल, वाऱ्यांचा वेग आणि समुद्रातील परिस्थितीमुळे मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत वातावरण अनुकूल झाल्यास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांचे लक्ष आता नव्या तारखेकडे लागले आहे. मान्सून उशिरा दाखल झाल्यास त्याचा शेती, पेरणी आणि काही भागांतील तापमानावर परिणाम होऊ शकतो. मात्र हवामान तज्ज्ञांनी घाबरण्याचे कारण नसून, पुढील काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असताना, उत्तर आणि मध्य भारत तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहे. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले आहे की नैऋत्य मान्सून केरळमध्ये लवकर दाखल होणार नाही. यापूर्वी, तो २६ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची अपेक्षा होती, परंतु आता तो त्याच्या नेहमीच्या वेळेनुसार, म्हणजेच १ जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, कमकुवत वारे आणि प्रतिकूल हवामानामुळे मान्सूनची गती मंदावल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता 8 ते 10 जूनदरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हवामानशास्त्रज्ञांच्या मते हा पाऊस मान्सूनच्या निर्धारित मानकांनुसार नाही. आयएमडीने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या मान्सून बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राचा उर्वरित भाग, कोमोरिन प्रदेश, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात पुढे सरकू शकतो. यावर्षी, अंदमान आणि निकोबार बेटे व आसपासच्या परिसरात मान्सून नियोजित वेळेच्या आधीच १६ मे रोजी दाखल झाला. त्यानंतर २३ मे पर्यंत तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या अनेक भागांमध्ये पोहोचला. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये पोहोचत नसला तरी, तो त्याच्या नेहमीच्या १ जूनच्या तारखेच्या आधी येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचा असाही विश्वास आहे की, एल निनोच्या बदलत्या परिस्थितीमुळे यावेळी मान्सूनच्या गतीवर आणि सक्रियतेवर परिणाम होऊ शकतो.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत तामिळनाडू, पुदुचेरी, केरळ, आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी ७ ते २० सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. असे असूनही, देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट थैमान घालत आहे. उत्तर भारत, मध्य भारत आणि बुंदेलखंडमधील अनेक शहरांमध्ये गेल्या १० दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे. सोमवारी, अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसाचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते.
सोमवारी, उत्तर प्रदेशातील बांदा, महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी आणि मध्य प्रदेशातील खजुराहो ही देशातील सर्वात उष्ण शहरांपैकी होती. बांदा आणि ब्रह्मपुरी येथे ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर खजुराहोमध्ये हे तापमान ४७.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. दिल्लीतील लोकांनाही सध्या तीव्र उष्णतेचा अनुभव येत असून, दिवस आणि रात्र दोन्हीही भाजून काढणारी आहेत. सोमवारी ३२.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे गेल्या १४ वर्षांतील मे महिन्यातील ही सर्वात उष्ण रात्र ठरली. हवामान विभागाच्या मते, २८ मे पर्यंत उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
पावसाळ्यात तुमचीही कार होऊ शकते भंगार! गंज लागू नये म्हणून झटपट करा हे काम