
१६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद...; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर
दरम्यान शिंदी, वलवण, चकदेव, आरव, पर्वत, मोरणी, म्हाळुंगे, उचाट, सालोशी, कांदाट, बन, वाघावळे, लामज, निवळी, आकल्पे आणि पिंपरी या गावांतील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक आव्हानांचा सामना करत केलेली भातलागवड पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली असून अनेक ठिकाणी शेतीमध्ये गाळ साचल्याने हंगाम धोक्यात आला आहे.
Satara Rain News: सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम! कोयना धरणात ३५.७१ टीएमसी साठा, प्रशासन सतर्क
कोकणाला जोडणारा उचाट–शिंदी–रघुवीर घाट मार्गावर अनेक ठिकाणी दरडी आणि झाडे कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा आणि मोबाईल नेटवर्कही खंडित असल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे. सर्वात मोठी अडचण विजेची असून वीज गायब झाल्याने या भागात फक्त बीएसएनएलचे टाॅवर आहेत. वीज खंडित झाल्याने मोबाईल टॉवर बंद पडले असून लोकांना बाहेरील जगाशी संपर्क करणे अडचणीचे ठरत आहे.
कांदाटी खोऱ्यातील सोळा गावे सातारा जिल्ह्यात असली तरी त्यांचे बाजारपेठ, शाळा, दवाखाना आदी सुविधांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड बाजारपेठेशीच संपर्क असतो. गावे सातारा जिल्ह्यात पण सुविधा रत्नागिरी जिल्ह्यातील असं या ठिकाणचे जनजीवन आहे. पावसामुळे रघुवीर घाट बंद झाल्यास या लोकांची गैरसोय होते. अतिशय दुर्गम भागातील जीवन अत्यंत कठीण मानले जाते. भारतातील सर्वात पाऊस येथील शिंदी, लामज परिसरात होतो. त्यामुळे येथील जनजीवन मोठ्या पावसात पूर्णपणे ठप्प होते.
सातारा शहरातही पावसाची संततधार आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. साताऱ्यासह वाई, जावळी, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. पावसामुळे पाटण तालुक्यातील पाबळ नाला धबधबा या ठिकाणी रस्ता खचला आहे.