Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mehbooba Mufti: मेहबूबा मुफ्ती यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, “मंदिर हे पूजेसाठी आहेत, तुम्ही त्यांना…”

मेहबुबा मुफ्तींनी जम्मूतील पूरस्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'मंदिरे पिकनिक स्पॉट नाहीत, ती पूजेसाठी आहेत' अशी टीका करत त्यांनी पूरग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजची मागणी केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 04, 2025 | 08:09 PM
Mehbooba Mufti: मेहबूबा मुफ्ती यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, “मंदिर हे पूजेसाठी आहेत, तुम्ही त्यांना…”
Follow Us
Close
Follow Us:

Mehbooba Mufti on Central Govt: पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी जम्मूतील पूरस्थितीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील सरकारने आमचे डोंगर, जंगले, नद्या आणि नाले अगदी कवडीमोल दराने कंत्राटदारांना विकले आहेत, असा आरोप त्यांनी केला. वैष्णोदेवी आणि इतर धार्मिक स्थळांचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “ही मंदिरे केवळ पूजेसाठी आहेत. अशा ठिकाणी जाण्यासाठी तीन-चार महिन्यांचे नियोजन केले जाते, पण तुम्ही त्यांना पिकनिक स्पॉट बनवले आहे.”

‘आजचे पूल तुटले, ५० वर्षांपूर्वीचे तसेच उभे आहेत’

मेहबूबा मुफ्तींनी आज बांधले गेलेले पूल तुटल्याबद्दल चिंता व्यक्त केली, तर ५०-६० वर्षांपूर्वीचे पूल आजही मजबूतपणे उभे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सिमेंटऐवजी केवळ वाळूचा वापर केला गेला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. २०१४ मध्येही अशीच नैसर्गिक आपत्ती आली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.

#WATCH | Jammu, J&K | PDP Chief Mehbooba Mufti says, “… Our government has handed over land, forest, and rivers to contractors on menial rates and left it up to them how they want to use it… The Amritsar-Katra six-lane highway is being built. Do these people not understand… pic.twitter.com/BXrOncAGDr

— ANI (@ANI) September 4, 2025


ज्या घरांमध्ये पाणी शिरून साचले आहे, त्यांना ‘अंशतः खराब’ न मानता ‘पूर्णतः खराब’ मानून पूर्ण नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. ‘घरात पाणी साचले की ते धोकादायक बनते, भलेही भिंती उभ्या असल्या तरी’ असे त्या म्हणाल्या.

हे देखील वाचा: Yamuna Flood: यमुनेला महापूर! दिल्ली बुडण्याच्या मार्गावर? ‘हे’ मार्ग पाण्याखाली; अनेक मेट्रो स्टेशन्स तर…

‘भारत सरकारने मोठे पॅकेज जाहीर करावे’

गुरुवारी (४ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत पीडीपी अध्यक्षा म्हणाल्या की, ज्यांची घरे नाल्यांच्या बाजूला आहेत, त्यांना दुसरीकडे जागा द्यावी. जर हे शक्य नसेल, तर नाल्यांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना करा. “हे येथील भाजप आमदार, केंद्र सरकार आणि स्थानिक सरकारसाठी आव्हान आहे. आज भारत सरकारने मोठे मदत पॅकेज जाहीर करायला हवे.” असे आवाहन त्यांनी केले.

‘मेडिकल टीम्स पाठवा, शेतकऱ्यांच्या कर्जाकडे लक्ष द्या’

मुफ्तींनी पूरग्रस्त भागात मेडिकल टीम्स पाठवण्याची मागणी केली. घरांमध्ये साचलेल्या चिखलामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना सरकारने राहण्यासाठी जागाही दिली नाही, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्याकडे सरकारने लक्ष द्यावे आणि पुढील दोन-तीन महिने बँकांनी त्यांच्या दारांवरून जाणे बंद करावे, यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Mufti attacks modi govt on temple tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 08:09 PM

Topics:  

  • Central Governement
  • Jammu and Kashmir
  • Landslide News

संबंधित बातम्या

दरवर्षी किती करुन घेणार पावसामुळे नुकसान? योजना आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा फायदा होणार तरी कधी?
1

दरवर्षी किती करुन घेणार पावसामुळे नुकसान? योजना आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा फायदा होणार तरी कधी?

West Bengal Assembly Clash: बंगाल विधानसभेत तुफान राडा! तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार हाणामारी; Video व्हायरल
2

West Bengal Assembly Clash: बंगाल विधानसभेत तुफान राडा! तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार हाणामारी; Video व्हायरल

जम्मू-काश्मीरवर निसर्गाची वक्रदृष्टी; पूर अन् भूस्खलनामध्ये २५०० रस्ते खचले, 100 कोटींहून अधिक नुकसान
3

जम्मू-काश्मीरवर निसर्गाची वक्रदृष्टी; पूर अन् भूस्खलनामध्ये २५०० रस्ते खचले, 100 कोटींहून अधिक नुकसान

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग बिलाला कोर्टात आव्हान, पण केंद्र सरकारनं ठणकावून सांगितलं की…
4

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग बिलाला कोर्टात आव्हान, पण केंद्र सरकारनं ठणकावून सांगितलं की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.