नवी दिल्ली : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्यद्विपला भेट दिल्यानंतर मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. याचे प्रमुख कारण ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष्यद्विपला केलेले फोटोसेशन आणि लक्ष्यद्विपला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा हेतू. त्यातच मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी मोठे वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरुन आलेल्या मुइझ्झू यांनी भारतावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सूचक वक्तव्य करीत भारतावर बाण सोडला आहे.
मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती
मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी मोठं वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरुन आलेल्या मुइझ्झू यांनी भारतावर निशाणा साधला आहे. कोणत्याच देशाला आमच्यावर दादागिरी गाजवण्याचा अधिकार नाही, असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
मालदीवच्या काही नेत्यांना मिरची
आम्ही लहान देश असू पण, यामुळे तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना मिळत नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपमध्ये गेले होते. या त्यांच्या दौऱ्यावरुन मालदीवच्या काही नेत्यांना मिरची लागली होती. त्यांनी मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालाय.






