नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर भीषण हल्ला करून काउंटर अटॅक केला. मात्र पाकिस्तान सुधरण्याचे नावच घेत नाहीये. पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताच्या 26 शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने ते हल्ले परतवून लावले आहेत. सीमेवर तणाव वाढला आहे.
पाकिस्तानकडून भारतातील 26 ठिकाणी हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय लष्कराची महत्वाची ठिकाणी आणि नागरिक वस्ती यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात राज्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भारताने हल्ला परतवून लावला.
भारतीय लष्कराने पाकिस्तानचा ड्रोन हल्ला परतवून लावला. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले आहेत. सुरक्षा दल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सीमेवर हायअलर्ट देण्यात आला आहे. दिल्लीत महत्वाच्या बैठका सुरू आहेत.
पठाणकोट एअरबेसवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न
पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. त्यासोबतच पंजाब, राजस्थान, गुजरातमध्ये ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न केला आहे. मात्र भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. सध्या भारतीय सुरक्षा दले अलर्ट मोडवर आहेत. पठाणकोट एअरबेस सुरक्षित आहे. तसेच ड्रोन हल्ल्यात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही अशी माहिती समोर येत आहे.
‘हा’ व्यक्ती पाकिस्तानला भारतापासून वाचवणार?
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. काल पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक देखील केला. भारतीय नौदल, हवाई दल, वायुसेनेने पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला चढवला. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानची स्थिती खराब केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानला वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान मैदानात उतरले असल्याचे समजते आहे.
India Vs Pakistan War Live: सांबा सेक्टरमध्ये BSF ची मोठी कारवाई; 7 दहशतवाद्यांचा खात्मा
भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते. आता पाकिस्तानला वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे मैदानात उरतल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नावज शरीफ हे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे मोठे भाऊ आहेत. नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या काही बैठकांमध्ये सहभाग घेतल्याचे म्हटले जात आहे. नवाज शरीफ यांचे भरतासोबत चांगले संबंध आहेत. भारत आणि पाकिस्तान यांचे सबंध चांगले व्हावेत अशी त्यांची देखील इच्छा असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे आता या युद्धजन्य परिस्थितीमध्ये नवाज शरीफ हे पाकिस्तानला वाचवणार का हे पहावे लागणार आहे.