
PM Narendra Modi Mann Ki Baat 132nd Episode Live Today on war Marathi News
शेजारील देशांमध्ये भीषण युद्ध
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, “गेल्या महिनाभरापासून आपल्या शेजारी भीषण युद्ध सुरू आहे. लाखो भारतीय कुटुंबांचे नातेवाईक या देशांमध्ये राहतात, विशेषतः आखाती देशांमध्ये काम करणारे. ते १० दशलक्षाहून अधिक भारतीयांना सर्व प्रकारची मदत पुरवत आहेत. त्यांनी देशवासियांना सतर्क राहण्याचे आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले. तसेच या परिस्थितीमध्ये राजकारण न करण्याचे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे संकट निर्माण होत आहे. आव्हाने असूनही, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत अधिक भक्कम स्थितीत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “भारताचे जागतिक संबंध, विविध देशांकडून मिळणारी मदत आणि गेल्या एका दशकात देशाने विकसित केलेली क्षमता यामुळेच भारत या आव्हानांचा ठामपणे सामना करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : “अजूनही वेळ गेलेली नाही…: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य
हा काळ कठीण असल्याचे नमूद करत, पंतप्रधान मोदींनी जनतेला एकजूट राहण्याचे आवाहन केले. “हा निःसंशयपणे एक आव्हानात्मक काळ आहे. मी पुन्हा एकदा देशवासीयांना आवाहन करतो की, त्यांनी एकजूट होऊन या आव्हानावर मात करावी. मला खात्री आहे की, ज्याप्रमाणे आपण यापूर्वीच्या संकटांवर नेहमीच मात केली आहे—देशातील १४० कोटी नागरिकांच्या सामूहिक शक्तीच्या बळावर—त्याचप्रमाणे, यावेळीही आपण या कठीण परिस्थितीवर मोठ्या यशाने मात करू,” असेही ते पुढे म्हणाले आहेत.
पुढे पंतप्रधान मोदींनी आयपीएल वर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, देशभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा महिना उत्साह आणि आनंदाने भरलेला होता. जेव्हा भारताने टी-२० विश्वचषकात ऐतिहासिक विजय मिळवला, तेव्हा देशभरात आनंदाची लाट पसरली. त्यांनी देशवासियांना या उल्लेखनीय कामगिरीचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
हे देखील वाचा : रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई
त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी अस्मिता ॲथलेटिक्स लीगचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त या लीगमध्ये अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यात अंदाजे दोन लाख मुलींनी सहभाग घेतला होता. देशातील क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यात भारताची महिला शक्ती महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हे पाहून आनंद होतो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून व्यक्त केल्या आहेत.