(फोटो सौजन्य: Pinterest)
‘रेमंड’चे संस्थापक विजयपत सिंघानिया यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास
केवळ ३ वेळा अपघात
रेली रुळांशी छेडछाड करून अपधात घडवण्याच्या घटना अत्यल्प असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मागील पाच वर्षांत अशा कैयता ३ घटना घडल्या असून त्या वाल्टेयर, झाशी आणि चेन्नई विभागात प्रत्येकी एक अशा नोंदल्या गेल्या.
सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाची मदत
रेल्वे मार्गावरील गुन्हे रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर वाढविण्यात आला आहे. ड्रोनद्वारे निगराणी, सौरऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे, संवेदनशील भागामध्ये वाढीव गस्त तसेच राज्य पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांशी समन्वय अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच रेल्वे मार्गालगत राहणा-या नागरिकांना संशयास्पद हालवालीची माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दगडफेक रोखण्यासाठी विशेष मोहीम
रेल्वे गाड्यांवरील दगडफेक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत १२ हजार १५७ दगडफेक प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यामध्ये ८ हजार ४४१ जणांना अटक करण्यात आली आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्यामुळे अशा घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे रेल्वेने म्हटले आहे.






