Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi Speech: “… मात्र भारताने पाकिस्तानच्या छाताडावर वार केला”; मोदींचा जोरदार हल्लाबोल

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह येत देशवासियांना संबोधित केले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2025 | 08:27 PM
PM Narendra Modi Speech: “… मात्र भारताने पाकिस्तानच्या छाताडावर वार केला”; मोदींचा जोरदार हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

PM Narendra Modi Live: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यानंतर पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेली कारवाई, घेतलेले अनेक धोरणात्मक निर्णय यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी नक्की काय संबोधन केले आहे, ते जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी सर्वात पहिल्यांदा भारताच्या पराक्रमी सैनिकांना, गुप्तचर यंत्रणा आणि सर्व देशवासीयांना सलाम करतो. गेल्या काही दिवसांत आपण देशाचे सामर्थ्य आणि संयम दोन्ही पाहिला. ऑपरेशन सिंदूरमधून देशाची ताकद दिसून आली. २२ एप्रिलला पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांवर हल्ला झाला. अतिरेक्यांनी यांच्या बहीणींचे कुंकू पुसले. म्हणून आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारले आहेत.”

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “दहशतवाद्यांची मुख्य अड्डे आम्ही उद्ध्वस्त केले. स्वप्नातही अतिरेक्यांनी विचारही केला नसेल अशी आम्ही त्यांना शिक्षा दिली आहे. ऑपरेशन सिंदूर हे देशातील नागरिकांची भावना आहे. पाकिस्तानचा उद्देश भारताच्या सीमेला लक्ष्य करण्याचा होता. मात्र भारताने पाकिस्तानच्या छाताडावर वार केला.”

“आम्ही भारतीय सैन्याला कारवाई करण्यासाठी खुली सूट दिली. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उडवून लावले. पाकिस्तान जगाकडे भीक मागत होता. मात्र पाकिस्तानने भारताच्या  नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. आम्ही पाकिस्तानविरुद्धची कारवाई केवळ स्थगित केली आहे. भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर दिले जाईल.”

“यांच्या देशाचे आणि नागरिकांचे  संरक्षण करण्यासाठी आम्ही कडक पावले उचलण्यास सक्षम आहेत. ऑपरेशन सिंदूरने देशाचे सामर्थ्य दाखवले आहे. दहशतवादी हल्ला झाल्यास भारत जोरदार उत्तर देणार. युद्धाच्या मैदानावर आपण नेहमी पाकिस्तानला धूळ चारली आहे. दहशतवादाचे ज्या ठिकाणी उगमस्थान असेल त्या ठिकाणी हल्ले करणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“पाकिस्तानला जर वाचायचे असेल तर त्याला स्वतःलाच दहशतवादाचा नाश करावा लागेल. दहशतवादी आणि संवाद एकाच वेळी होणार नाही. पाणी आणि रक्तपात एकाच वेळी वाहू शकत नाही. हे भारताचे स्पष्ट मत आहे. सध्याचा युग हे दहशतवादाचे आणि युद्धाचे नाही. पाकिस्तानशी बोलणे झाले तर पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादावरच होईल”, असे मोदी म्हणाले.

काय आहे पहलगाम हल्ला प्रकरण?

२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी २८ निष्पाप नागरिकांना मारले होते. त्यानंतरभारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावरच हल्ले करले. मात्र भारताने सर्व हल्ले परतवून लावले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर देशवासियांना संबोधित केले.

Web Title: Pm narendra modi speech to bharat operation sindoor and pahalgam terror attack news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 08:05 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार
1

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार

श्रीलंकेसाठी भारत बनला ‘संकटमोचक’! मध्यपूर्वेतील युद्धामुळे कोलमडलेल्या लंकेला 38,000 मेट्रिक टन इंधनाची ‘संजीवनी’
2

श्रीलंकेसाठी भारत बनला ‘संकटमोचक’! मध्यपूर्वेतील युद्धामुळे कोलमडलेल्या लंकेला 38,000 मेट्रिक टन इंधनाची ‘संजीवनी’

Mann ki baat today : “सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण नका करु…; PM मोदींचे ‘मन की बात’मधून आवाहन
3

Mann ki baat today : “सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण नका करु…; PM मोदींचे ‘मन की बात’मधून आवाहन

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला काढणार ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’
4

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला काढणार ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.