Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyanka Gandhi : देशभक्तीचा खरा अर्थ कोणी शिकवला? प्रियांका गांधींची ती भावनिक पोस्ट चर्चेत

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त, संपूर्ण भारतात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानिमित्त प्रियांका गांधी यांनी भावनिक संदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 21, 2025 | 09:03 PM
देशभक्तीचा खरा अर्थ कोणी शिकवला? प्रियांका गांधींची ती भावनिक पोस्ट चर्चेत

देशभक्तीचा खरा अर्थ कोणी शिकवला? प्रियांका गांधींची ती भावनिक पोस्ट चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

“मी राजीव गांधी यांच्याकडून देशभक्तीचा खरा अर्थ शिकले आहे. आपल्या देशाशी प्रामाणिक राहणे. देशवासीयांचा आदर करणे, प्रत्येक संघर्षाला न जुमानता तुमची कर्तव्ये पार पाडणे आणि शेवटी तुमच्या देशासाठी हसत मृत्यूला कवटाळणे.”, असा भावनिक संदेश प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिला आहे. आपले वडील केवळ एक राजकारणी नव्हते तर एक खरे देशभक्त होते ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केले, असंही त्यांनी म्हटलं आहे.

PM मोदींचं जिनिव्हात भाषण : ‘वन वर्ल्ड फॉर हेल्थ’ थीमअंतर्गत जगासमोर मांडला भारताचा आरोग्यदृष्टीकोन

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त, संपूर्ण भारतात श्रद्धांजली वाहण्यात आली. देशभरातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीव गांधींना ‘बलिदान दिवस’ म्हणून स्मरण केले आणि त्यांना आदरांजली वाहिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यांच्या वडिलांचे स्मरण केले आणि दिल्लीतील वीरभूमीवर श्रद्धांजली वाहिली.

राजीव जी से देश भक्ति का असली मायना समझा- अपने देश के प्रति सत्य का भाव रखना, देश की जनता के प्रति श्रद्धा भाव रखना, अपने कर्तव्य को हर संघर्ष के बावजूद निभाना और मुस्कुराते हुए अपने देश के लिए शहीद हो जाना। 🙏🏼 — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 21, 2025

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “तुमच्या आठवणी मला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतात. मी तुमची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करतो आणि मी ती पूर्ण करेन.” असं म्हटलं आहे.

राजकीय मतभेद असूनही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीव गांधींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले, “आज राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहतो, असं त्यांनी म्हटलं आहे.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राजीव गांधी यांचे वर्णन “भारताचे महान सुपुत्र” असं केले आहे. राजीव गांधी यांनी भारताला २१ व्या शतकात नेणाऱ्या दूरदर्शी सुधारणांचा पाया घातल्याचंही त्यांनी सांगितलं. सचिन पायलट म्हणाले की, “राजीव गांधी एक दूरदर्शी नेते होते. त्यांचा प्रगतीशील दृष्टिकोन आणि आधुनिक विचारसरणीने देशाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या धोरणांनी भारताला नव्या उंचीवर नेले.”

राजीव गांधी आधुनिक भारताचे शिल्पकार

राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी झाला. १९८४ मध्ये त्यांच्या आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. राजीव गांधींचा कार्यकाळ १९८४ ते १९८९ पर्यंत होता. या काळात त्यांनी भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक आधुनिकीकरणाचा पाया घातला. त्यांनी संगणक, दूरसंचार आणि शिक्षण क्षेत्रात अनेक सुधारणा राबवल्या.१९८८ मध्ये, त्यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज (NASSCOM) ची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे भारताच्या सॉफ्टवेअर उद्योगाला जागतिक मान्यता मिळाली. त्यांच्या कार्यकाळात शाळा आणि विद्यापीठांमध्ये संगणक शिक्षणाचा प्रचार करण्यात आला.

वक्फ कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद; कायद्यातील असंवैधानिक तरतुदींवर सविस्तर आक्षेप

बलिदान दिवस

२१ मे १९९१ रोजी, तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान LTTE ने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींची हत्या करण्यात आली. त्यांच्या निधनाने केवळ काँग्रेस पक्षालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला.राजीव गांधींना आजही आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी सुरू केलेल्या सुधारणा आणि तांत्रिक उपक्रमांनी भारताला २१ व्या शतकात नेले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात श्रद्धांजली अर्पण केल्याने लोकांना पुन्हा एकदा आठवण झाली की खरे राष्ट्रनिर्माते केवळ पदांनी नव्हे तर विचारांनी आणि कृतींनी ओळखले जातात.

Web Title: Priyanka gandhi shared emotional post on rajiv gandhi death anniversary latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 09:02 PM

Topics:  

  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi
  • Rajiv Gandhi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.