बोगस टोल वसुली प्रकरणी ईडीची मोठी कारवाई (फोटो सौजन्य-X)
नवी दिल्ली : गैरव्यवहार झाल्यास ईडीकडून सातत्याने कारवाई केली जाते. त्यातच आता बोगस टोल वसुली आणि सरकारी खात्यांमधून निधीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने एक मोठी मोहीम सुरू केली. ईडीच्या लखनौ विभागीय कार्यालयाच्या एका पथकाने पीएमएलए (PMLA) अंतर्गत 14 ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू केली.
ईडीची ही मोहीम उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, जम्मू, मध्य प्रदेश, एनसीआर आणि कोलकाता येथे राबवली जात आहे. तपासात असे उघड झाले आहे की, विविध एनएचएआय (NHAI) टोल प्लाझावर अनधिकृत सॉफ्टवेअरचा वापर केला जात होता. या सॉफ्टवेअरचा वापर खऱ्या टोल पावत्यांऐवजी बोगस किंवा अनधिकृत पावत्या तयार करण्यासाठी केला जात होता आणि टोलच्या रकमेचा काही भाग सरकारी खात्यांमध्ये नोंद होण्यापूर्वीच वळवला जात होता.
ईडीच्या माहितीनुसार, फॉरेन्सिक तपास आणि एनएचएआयच्या नोंदींनी अशा सॉफ्टवेअरच्या वापराचा दुजोरा दिला आहे. याच्या आधारे, पुढील तपासासाठी ईडीने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे हस्तगत करणे, या फसवणुकीतून फायदा झालेल्यांना ओळखणे आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा माग काढणे, हे या छाप्यांचे उद्दिष्ट आहे.
टोल प्लाझा जप्तीचाच न्यायालयाने दिला आदेश
यापूर्वीही थेट कोर्टाने कारवाई केली आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन कमी दरात केल्याप्रकरणी वाशिम जिल्हा न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा धक्का दिला. महामार्गासाठी संपादित जमिनीच्या दराचे सुधारित आदेश दिल्यानंतरही मोबदला दिला नाही. त्यावरून वाशिम जिल्ह्यातील धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचा ऐतिहासिक आदेश दिला.
टोल प्लाझा जप्तीची पहिलीच वेळ?
शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसूल होण्यासाठी न्यायालयाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचा टोल प्लाझा जप्त होण्याची ही देशातील पहिलीच वेळ असू शकते, असे पक्षकाराचे वकील अॅड. उदय देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर मोठी नामुष्की ओढवली.
देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…






