Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mallikarjun Kharge News: ‘RSS वर बंदी घातलीच पाहिजे’; सरदार पटेलांच्या पत्राचा हवाला देत मल्लिकार्जून खर्गेंनी भाजपला आरसा दाखवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी खोट्या गोष्टींना सत्यात रूपांतरित करण्यात पटाईत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी संघावर बंदी घातली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 31, 2025 | 05:22 PM
Mallikarjun Kharge News: ‘RSS वर बंदी घातलीच पाहिजे’; सरदार पटेलांच्या पत्राचा हवाला देत मल्लिकार्जून खर्गेंनी भाजपला आरसा दाखवला
Follow Us
Close
Follow Us:
  • RSS देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी जबाबदार
  • नरेंद्र मोदी खोट्या गोष्टींना सत्यात रूपांतरित करण्यात पटाईत
  • नेहरू आणि पटेल यांच्यात खूप चांगले संबंध होते

 

Mallikarjun Kharge News:   राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा बंदी घातली पाहिजे कारण तो देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी जबाबदार आहे. सर्व अराजकतेचे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, त्यावर बंदी घातली पाहिजे,” अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पण त्याचवेळी हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Heavy Rain in New York: न्यू यॉर्कमध्ये १० मिनिटात रेकॉर्डब्रेक पाऊस; विमानापासून वीजेपर्यंत अनेक सेवा विस्कळीत

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टिप्पण्णी केली होती. त्यांच्या या विधानानंतर खर्गेंनी ही प्रतिक्रीया दिली आहे. “सरदार पटेल जम्मू आणि काश्मीरचे भारतात विलीनीकरण करू इच्छित होते, परंतु नेहरूंनी त्यांना या विलीनीकरणापासून रोखले. पक्षाने ब्रिटीश राजवटीपासून मिळालेल्या गुलामगिरीची मानसिकता स्वीकारली आहे, अशी टिका मोदींनी केली होती.

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, “माझे वैयक्तिक मत असे आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली पाहिजे. देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी संघ आणि भाजप जबाबदार आहे, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी खोट्या गोष्टींना सत्यात रूपांतरित करण्यात पटाईत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी संघावर बंदी घातली होती. जर तुम्ही (भाजपा) प्रत्येक गोष्टीसाठी काँग्रेसला दोष देत असाल तर तुमच्या स्वतःच्या कृतींकडे पहा.” असा टोलाही खर्गेंनी यावेळी लगावला.

Ahilayangar News: साखर कामगारांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्क्यांची होणार वेतनवाढ

“पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांचे संबंध चांगले होते”

“तुम्ही सत्य कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी ते पुसले जाणार नाही. पंतप्रधान आणि भाजप नेहमीच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील संघर्षाचे चित्रण उभे करण्याचा प्रयत्न करत असतात. पण नेहरू आणि पटेल यांच्यात खूप चांगले संबंध होते. असेही खर्गेंनी यावेळी स्पष्ट केले. पण मी भाजपला सांगू इच्छितो की दहीहंडीत दगड शोधू नका. तुमचा इतिहास सर्वांना माहिती आहे. गुजरातमध्ये पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण करणारे आणि सरदार सरोवर धरणाची पायाभरणी करणारे नेहरू हे पहिले होते.” असंही खर्गेनी यावेळी स्पष्ट केलं.

“सरदार वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान प्रचंड आहे, यावर जवाहरलाल नेहरू यांचा विश्वास होता. होते की ‘आरएसएसने गांधीजींच्या मृत्युचा उत्सव साजरा केला आणि मिठाई वाटली.’ त्यामुळे सरकारकडे आरएसएसवर बंदी घालण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता,” असे खुद्द ४ फेब्रुवारी १९४८ रोजी सरदार पटेल यांनी एका पत्रात लिहिले आहे. असंही खर्गेंनी यावेळी सांगितले. खर्गे म्हणाले की, सरदार पटेल यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे, आरएसएस आणि हिंदू महासभेच्या विचारसरणीने निर्माण केलेले विषारी वातावरण महात्मा गांधींच्या हत्येस जबाबदार ठरले. काँग्रेस नेत्यांनी या पार्श्वभूमीवर गांधी, नेहरू आणि पटेल यांच्या विचारसरणीतील एकात्मतेवर भर दिला.

 

Web Title: Rss must be banned mallikarjun kharge shows a mirror to bjp citing sardar patels letter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • BJP
  • Mallikarjun Kharge
  • RSS

संबंधित बातम्या

Bihar Election NDA Manifesto : एक कोटी नोकऱ्या, मोफत वीज ते मिशन करोडपतीपर्यंत 4 शहरांमध्ये मेट्रो, एनडीएचे “संकल्प पत्र” जाहीर
1

Bihar Election NDA Manifesto : एक कोटी नोकऱ्या, मोफत वीज ते मिशन करोडपतीपर्यंत 4 शहरांमध्ये मेट्रो, एनडीएचे “संकल्प पत्र” जाहीर

Maharashtra Politics: “आमचा आवाज दाबण्यासाठी…”; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
2

Maharashtra Politics: “आमचा आवाज दाबण्यासाठी…”; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Dharashiv Politics: धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकीय रणकंदन! भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची बॅनरबाजी, शहराच्या विकासाला ‘ब्रेक’
3

Dharashiv Politics: धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकीय रणकंदन! भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची बॅनरबाजी, शहराच्या विकासाला ‘ब्रेक’

जालन्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढली! ‘या’ नेत्यांनी सपकाळांच्या उपस्थितीत केला प्रवेश
4

जालन्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढली! ‘या’ नेत्यांनी सपकाळांच्या उपस्थितीत केला प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.