Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतील पराभावाचे कारण काय?; काँग्रेसच्या तथ्य शोध समिती अहवालात धक्कादायक माहिती

लोकसभा निवडणुकीत दिल्लीत आम आदमी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे आता आप आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 08, 2024 | 03:07 PM
photo credit : team Navrashtra

photo credit : team Navrashtra

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीत दिल्लीत आम आदमी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे आता आप आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  काँग्रेसने दिल्लीतील पराभवामागे आपला जबाबदार धरल्याची माहिती आता समोर आली आहे. काँग्रेसच्या फॅक्ट फाईंडिंग कमिटीच्या अहवालात ही बाब समोर आल्याचे म्हटले आहे.

आघाडीच्या अंतर्गत दिल्लीत काँग्रेसला सातपैकी तीन जागा मिळाल्या होत्या आणि आम आदमी पक्षाने चार जागांवर उमेदवार उभे केले होते. सातही जागांवर युतीचे उमेदवार पराभूत झाले. काँग्रेसच्या उमेदवारांनी आता पराभवासाठी आम आदमी पार्टीला जबाबदार धरले आहे.

दिल्लीतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने तथ्य शोध समिती स्थापन केली होती. दिल्लीतील तीनही उमेदवारांनी तथ्य शोध समितीसमोर पराभवाची कारणे दिली होती. या समितीने आता आपला अहवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सादर केला आहे

आप-काँग्रेसच्या प्रतिनिधींमध्ये समन्वयाचा अभाव
उमेदवारांच्या पराभवाला आम आदमी पक्षच जबाबदार असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. समितीच्या नेत्यांसोबतच्या झालेल्या  बैठकीत उमेदवारांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार उदित राज, जेपी अग्रवाल आणि कन्हैया कुमार यांनी तथ्य शोध समितीसमोर आरोप केला आहे की आम आदमी पक्ष निवडणुकीत आपली मते हस्तांतरित करण्यात अपयशी ठरला आहे.

यासोबतच काँग्रेसचे संघटन नसणे हेही दिल्लीतील पराभवाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. तसेच,  निवडणूक प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाने त्यांना पाठिंबा दिला नसल्याचेही या तीनही नेत्यांनी फॅक्ट फाइंडिंग कमिटीला सांगितले आहे. तथापि, तीनही उमेदवारांनी काँग्रेस केडरशी चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळे उमेदवारांनाही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले, असेही तथ्य शोध समितीने काँग्रेस अध्यक्षांना सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, युती अंतर्गत केंद्रशासित प्रदेशात सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाने चार तर काँग्रेसने तीन जागांवर उमेदवार उभे केले होते. युतीमध्ये काँग्रेसला उत्तर पश्चिम दिल्ली, चांदनी चौक आणि उत्तर पूर्व दिल्लीच्या जागा मिळाल्या होत्या. पक्षाने उत्तर-पश्चिम मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री उदित राज, चांदनी चौकचे माजी खासदार आणि दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जेपी अग्रवाल आणि उत्तर-पूर्व दिल्लीतून कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

Web Title: What was the reason for the defeat in delhi shocking information in congress fact finding committee report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 03:07 PM

Topics:  

  • aam adami party
  • Congress
  • delhi
  • Mallikarjun Kharge
  • national news
  • political news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
3

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
4

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.