
मणीपुरमधील राष्ट्रपती शासन संपले
युमनाम खेमचंद सिंह मणिपुरचे नवीन मुख्यमंत्री
राज्यपाल अजय भल्लांनी दिल्या शुभेच्छा
आजचा दिवस मणिपुरसाठी खास ठरला आहे. मणिपुरमध्ये लागू असलेले राष्ट्रपती राजवट आता संपली आहे. मणिपुरमध्ये सरकार स्थापन झाले आहे. युमनाम खेमचंद सिंह मणिपुरचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यपाल अजय भल्लांनी युमनाम खेमचंद सिंह यांनी मणिपुरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तब्बल 33 महिन्यांनी मणिपुरमध्ये सरकार स्थापन झाले आहे. भाजपने मणीपुरमध्ये सरकार स्थापन केले आहे.
A new chapter begins for Manipur as Shri @YKhemchandSingh took oath as the Hon’ble Chief Minister today at Lok Bhavan, administered by the Hon’ble Governor of Manipur Shri Ajay Kumar Bhalla, in the presence of Hon’ble BJP National General Secretary Shri @tarunchughbjp ji , NE… pic.twitter.com/xykO3oWvJ2 — BJP Manipur (@BJP4Manipur) February 4, 2026
मणिपुर राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री देखील मिळाल्या आहेत. नेमचा किपगेन आणि लोदी दीखो यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नेमचा किपगेन मणिपुरच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. वेगवेगळ्या समुदायातिल दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती भाजपने समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या वर्षभरापासून राष्ट्रपती राजवट
१३ फेब्रुवारी २०२५ रोजी मणिपूरमध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. हा कार्यकाळ फक्त ६ महिन्यांसाठी होता आणि ऑगस्ट २०२५ मध्ये पुन्हा ६ महिन्यांसाठी वाढविण्यात आला. एन. बिरेन सिंग यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट अखेर हटवली; वाय. खेमचंद सिंह असणार राज्याचे नवे मुख्यमंत्री
मणिपुरात भाजपचे 37 आमदार
मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ २०२७ मध्ये संपत आहे. परिणामी, आमदारांना किमान एक वर्षासाठी नवीन सरकार स्थापन करावे आणि काही काम पूर्ण झाल्यानंतरच सार्वजनिक निवडणुका घ्याव्यात अशी इच्छा आहे. सध्या, ६० जागांच्या मणिपूर विधानसभेत भाजपचे ३७ आमदार आहेत.