Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उच्च न्यायालयातही त्यांच्या पदरी निराशाच येईल’; ठाकरे गटाबाबत भाजप प्रदेशाध्यक्षांची भविष्यवाणी

ठाकरे गटाने न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उच्च न्यायालयात गेले तरी त्यांच्या पदरी निराशाच येईल अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 11, 2024 | 06:17 PM
‘उच्च न्यायालयातही त्यांच्या पदरी निराशाच येईल’; ठाकरे गटाबाबत भाजप प्रदेशाध्यक्षांची भविष्यवाणी
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : शिवसेना आमदार अपात्र निर्णयानंतर (MLA Disqualification Case) विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) बाजूने निकाल दिल्यामुळे ठाकरे गटाने (Thackeray group) आक्रमक भूमिका घेतली आहे. नार्वेकर यांनी पक्षपातीपणा केला असून नार्वेकर हे शिंदे गटाचे वकिल असल्याप्रमाणे निकाल वाचत असल्याची टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. यानंतर आता ठाकरे गटाने न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र यावर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी सडकून टीका केली. त्यांनी उच्च न्यायालयात जावे मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच येईल अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीवर निकाल दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधाऱ्यांनी हा निकाल योग्य असल्याचे म्हटले तर विरोधकांनी पक्षपाती निर्णय असल्याची टीका केली. यानंतर नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांना आमदार, खासदार सोडून गेले तेव्हाच त्यांचे पक्षातील नेतेपद संपले होते. अध्यक्षांनी दिलेला निर्णय योग्य असून उच्च न्यायालयात जाण्यापासून त्यांना कोणीही रोखले नाही, त्यांनी उच्च न्यायालयात जावे मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच येईल अशी भविष्यवाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

“निकाल हा निकाल असतो. मेरीटच्या आधारावर तो निकाल दिलेला आहे. जे मेरिट निवडणूक आयोगाने दिले आहे त्याच आधारावर निकाल लागला आहे. या निकालाचा पुढील राजकारणाशी काहीही संबंध नाही. विविध पक्षातील नेते यापूर्वीच एकनाथ शिंदे गटाकडे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास उत्सुक आहे. जे लोक आमच्याकडे येतील त्यांच्यासाठी आमचे दुपट्टे तयार आहे”  असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.

पुढे ते ठाकरे गटावर टीका करताना म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी निकाल पारदर्शक पद्धतीने दिला आहे. मतदानाच्या आधारावर पक्षाची नोंद होत असते. निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर तुमच्या सोबत नसेल तर आपोआपच पक्षाचे नेतेपद जाते. सर्वात जास्त लोकप्रतिनिधी आणि मते शिंदे गटाकडे आहे त्यामुळे तेच नेते असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. नियम सर्वांना सारखेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेगळा नियम उद्धव ठाकरे यांना वेगळा नियम, असे होणार नाही.” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Web Title: Bjp state president chandrashekhar bawankule criticized uddhav thackeray on court decision nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2024 | 06:17 PM

Topics:  

  • BJP
  • Chandrasekhar Bawankule
  • Rahul Narwekar
  • sanjay raut
  • Shinde group
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार
4

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.