Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vote Adhikar Yatra: राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या यात्रेमुळे वाढली भाजपची धाकधुक; SIR मुळे राजकारण तापणार!

SIR आणि वक्फ सुधारणा विधेयकामुळे RJD आणि काँग्रेसच्या बाजूने मुस्लिम-यादव समीकरण मजबूत झाल्याचा दावा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2025 | 04:51 PM
Vote Adhikar Yatra: राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या यात्रेमुळे वाढली भाजपची धाकधुक; SIR मुळे राजकारण तापणार!
Follow Us
Close
Follow Us:
  • राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बिहारमध्ये मतदार हक्क यात्रा
  • SIRला विरोध
  • भाजपची धाकधुक वाढली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बिहारमध्ये विशेष सघन सुधारणा (SIR) विरोधात मोठी यात्रा काढत आहेत. याला ‘मतदार हक्क यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. या यात्रेत गर्दी जमत असल्याचे पाहून भाजपची धाकधुक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राहुल गांधींची यात्रा पाहता भाजपने आपल्या आपल्या मोठ मोठ्या नेत्यांसह NDAतील मित्रपक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे.

बिहारमधील विशेष सघन सुधारणा प्रक्रिया आणि मतचोरीच्या मुद्द्यांविरोधात राहुल गांधी यांनी ही यात्रा सुरू केली असून इंडिया आघाडीचे अनेक नेते या यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत. दुसरीकडे बिहारमध्ये सुरू असलेल्या SIR प्रक्रियेमुळे भाजप किंवा NDAला कोणताही फायदा मिळाला नाही, उलट NDA ला पाठिंबा देणारे अनेत मतदारांची नावेही मतदार यादीतून वगळ्यात आली आहेत. SIR आणि वक्फ सुधारणा विधेयकामुळे RJD आणि काँग्रेसच्या बाजूने मुस्लिम-यादव समीकरण मजबूत झाल्याचा दावा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हायकोर्टाचा नकार, मात्र पोलिसांची परवानगी, ‘या’ अटीशर्तींसह आझाद मैदानावर…

प्रशांत किशोरांचे आरोप भाजपसाठी अडचणीचे

बिहारमधील जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी त्यांच्या मोठ्या नेत्यांवर केलेले आरोप देखील भाजपसाठी अडचणीचे ठरत आहेत. प्रशांत किशोर यांनी बिहार भाजप अध्यक्ष दिलीप कुमार जयस्वाल, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि आरोग्यमंत्री मंगल पांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रशांत किशोर यांनी तिघांवरही भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे आरोप केले आहेत तर भाजपने त्यांचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. किशोर यांनी दिलीप जयस्वाल यांनी फसवणूक करून एका शीख संस्थेचा ताबा घेतल्याचा, सम्राट चौधरी यांनी त्यांच्या शैक्षणिक नोंदींमध्ये छेडछाड केल्याचा आणि मंगल पांडे यांनी रुग्णवाहिका घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे.

सर्व २४३ विधानसभा जागांवर जनसंपर्क तयार करण्याची तयारी

बिहार भाजप सूत्रांचे म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रतिमेद्वारे आणि एनडीएच्या एकत्रित मोहिमेद्वारे त्यांचे कोणतेही नुकसान भरून काढले जाऊ शकते, असा पक्ष नेतृत्वाला विश्वास आहे. तर पक्षाने राज्यातील सर्व ३८ जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेण्याचे काम देखील त्यांच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना सोपवले आहे. एनडीएने बिहारच्या सर्व २४३ विधानसभा जागांवर जनसंपर्क करण्यासाठी १४ पथके तयार केली आहेत. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या दौऱ्यादरम्यान एवढी मोठी गर्दी जमेल अशी अपेक्षा नव्हती, अशी कबूलीही दिली आहे.

Rahul Gandhi News: गुजरातमधील अज्ञात पक्षांना ४३०० कोटींच्या देणग्या? राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर

यादव-मुस्लिम समाज एकत्र येण्याची तयारी

भाजपच्या एका खासदाराने सांगितले की, आम्ही मागे पडलो म्हणून राहुल गांधींच्या यात्रेत गर्दी जमली. प्रशांत किशोर यांच्या आरोपांमुळे आमच्या नेत्यांवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यादव आणि मुस्लिम समुदायाचे मतदार राजद आणि काँग्रेसशी एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. दलित समुदायाचा काही भाग भारत आघाडीकडेही जात आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या यात्रेला किंवा एसआयआरला मुद्दा बनवले जात आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एनडीएचे काही नुकसान होऊ शकते, असही या खासदाराने म्हटले आहे.

 

Web Title: Rahul gandhi tejashwi yadavs vote adhikar yatra increased bjps intimidation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • Tejaswi Yadav

संबंधित बातम्या

“शांतीपूर्ण विरोध करणे हा आता गुन्हाच”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, ‘लोकशाही धोक्यात’ असल्याचा गंभीर आरोप
1

“शांतीपूर्ण विरोध करणे हा आता गुन्हाच”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, ‘लोकशाही धोक्यात’ असल्याचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.