Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्ग : ‘या’ तारखेपर्यंत काम पूर्ण करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची योजना

राज्यातील १० जिल्ह्यांना प्रत्यक्ष आणि १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्ष जोडणारा नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग (Nagpur Mumbai Samruddhi Mahamarg) हा युती सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाला सुरुवात झाली.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 20, 2021 | 03:53 PM
Samruddhi Expressway Toll: समृद्धी महामार्गाला तीन वर्षे पूर्ण, धावली तीन कोटी वाहने, तर शेकडो कोटींचा महसूल जमा

Samruddhi Expressway Toll: समृद्धी महामार्गाला तीन वर्षे पूर्ण, धावली तीन कोटी वाहने, तर शेकडो कोटींचा महसूल जमा

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  राज्यातील १० जिल्ह्यांना प्रत्यक्ष आणि १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्ष जोडणारा नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग (Nagpur Mumbai Samruddhi Mahamarg) हा युती सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाला सुरुवात झाली. त्यानंतर विद्यमान महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) महामार्गाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Balasaheb Thackeray Samrudhi Highway) असे नाव दिले.

या महामार्गासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त निश्चित केला होता. मात्र तो हुकला आहे. आता त्यासाठी नवा मुहूर्त जवळजवळ निश्चित झाला असून १५ ऑगस्ट ही नवी डेडलाईन ठरवण्यात आली आहे. तसंच आता हे काम वेळेत पूर्ण व्हावं, यासाठी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आग्रही असल्याची माहिती आहे.

नागपूर इंटरचेंज हाच या समृद्धी महामार्गाचा ‘झिरो पाईंट’ आहे. नागपूर ते मुंबई जेएनपीटीपर्यंत ७०१ किमी लांबीच्या या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाले आहे. केवळ २८ टक्के काम शिल्लक आहे. महामार्गावरील उड्डाणपूल, इंटरचेंजचे काम अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर झिरो पाईंट असलेल्या नागपूर नजीकच्या शिवमडका येथे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झालं आहे.

५२० किमीचा पहिला टप्पा
समृद्धी महामार्गाचे काम ३० नोव्हेंबर २०१५ पासून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे आले. तेव्हापासून या मार्गाचं काम वेगात सुरू आहे. विक्रमी वेळेत जमीन अधीग्रहण यासह विविध कामे करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी दरम्यानचा ५२० किमीचा पहिला टप्पा १५ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला व्हावा यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Samrudhi highway chief minister uddhav thackeray insists to complete the work by this date nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2021 | 03:53 PM

Topics:  

  • mahavikas aghadi government
  • Mumbai
  • Uddhav Thackeray
  • मुख्यमंत्री

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर
2

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
3

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ
4

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.