Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भाशय काढून टाकल्यानंतर भविष्यात महिलांमध्ये उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या

मासिक पाळीतील वेदना, शारीरिक आणि मानसिक समस्या, कुटुंबिक समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. पण हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये गर्भाशय आणि अंडाशयासंबंधी समस्या जास्त उद्भवण्यास सुरुवात झाली आहे. या समस्या उद्भवल्यानंतर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तणावात जातात.तसेच या समस्या आणखीन गंभीर झाल्यानंतर गर्भाशय काढून टाकण्यास सांगितले जाते. अशावेळी महिलांच्या मनात अनेक समस्या उद्भवतात. चला तर जाणून घेऊया महिलांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 25, 2024 | 10:42 AM
शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला सामान्य जीवन जगू शकतात का?

शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला सामान्य जीवन जगू शकतात का?

Follow Us
Close
Follow Us:

तणावपूर्ण आणि चुकीची जीवनशैली जगल्यामुळे महिलांमध्ये आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात.आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे छोटे आजार आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते. महिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीतील वेदना, शारीरिक आणि मानसिक समस्या, कुटुंबिक समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. पण हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये गर्भाशय आणि अंडाशयासंबंधी समस्या जास्त उद्भवण्यास सुरुवात झाली आहे. या समस्या उद्भवल्यानंतर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तणावात जातात.

चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, हार्मोनल असंतुलन इत्यादी समस्या महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून आल्या आहेत. याचा मोठा धोका महिलांच्या गर्भाशय आणि अंडाशयाला असते. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स तसेच गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्यासंबंधित होणारे आजार सामान्य झाले असून अनेकांमध्ये दिसून आले आहेत.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: वयाच्या ९ किंवा १० वर्षात मासिक पाळी येण्यामागे नेमकी काय आहेत कारण? जाणून घ्या सविस्तर

महिलांना गर्भाशयाची समस्या निर्माण झाल्यानंतर काहीवेळ गर्भाशय काढावे लागते. तसेच महिलांची शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढले जाते. गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेपूर्वी स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न आणि भीती निर्माण झालेली असते. त्यातील सर्वच महिलांना उद्भवणारा प्रश्न म्हणजे गर्भाशय काढल्यानंतर महिलांमध्ये कोणत्या समस्या जाणवतात का? शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला सामान्य जीवन जगू शकतात का? असे अनेक प्रश्न महिलांना पडतात.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पुजा माधव यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रजोनिवृत्तीनंतर गर्भायश काढलं की नाही यावर सर्व समस्या अवलंबून असतात. हिस्टेरेक्टॉमीनंतर ओटीपोटाचे कार्ये बदलण्याची शक्यता असते. पण मासिक पाळी जाण्यापूर्वी गर्भाशय काढले तर स्त्रियांच्या आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तसेच 40 ते 50 वयोगटातील महिलांना गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो.

हे देखील वाचा: मासिक पाळीदरम्यान अधिक व्हजायनल दुर्गंधी का येते? कारणे आणि उपाय

गर्भाशय का काढले जाते?

गर्भाशयात झालेल्या फ्रॉयबॉईड, एंडोमेट्रोसिस, पेल्विकमध्ये वेदना किंवा कॅन्सर इत्यादी कारणांमुळे गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. महिलांच्या शरीरात सगळ्यात नाजूक भाग म्हणजे महिलांचे गर्भाशय. हेच गर्भाशय काढून टाकल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर महिलांनी आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच पोटात गर्भाशय नसल्यामुळे पेल्विक कार्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: After hysterectomy women may develop serious problems in the future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 10:42 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • menstruation health

संबंधित बातम्या

पायांच्या टाचांमध्ये ताठरपणा आल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, घरगुती उपचार करून मिळवा आराम
1

पायांच्या टाचांमध्ये ताठरपणा आल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, घरगुती उपचार करून मिळवा आराम

पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या ‘या’ हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात करा समावेश, गंभीर आजारांपासून राहाल दूर
2

पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या ‘या’ हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात करा समावेश, गंभीर आजारांपासून राहाल दूर

थोडंसं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात गुडगुड होते? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन करून गॅस-ब्लोटिंगवर मिळवा कायमचा आराम
3

थोडंसं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात गुडगुड होते? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन करून गॅस-ब्लोटिंगवर मिळवा कायमचा आराम

उकडलेली अंडी किती दिवस व्यवस्थित टिकतात? जाणून घ्या शिजवलेली अंडी खाण्याची योग्य वेळ
4

उकडलेली अंडी किती दिवस व्यवस्थित टिकतात? जाणून घ्या शिजवलेली अंडी खाण्याची योग्य वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.