Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा! अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिला उपवास करतात. उपवासाच्या दिवशी उपाशी पोटी साबुदाणे खाल्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे उपवास करताना या चुका अजिबात करू नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 23, 2025 | 08:45 AM
नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा! अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा! अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा करून देवीला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय नऊ दिवसांमध्ये अनेक ठिकणी गरबा आणि दांडियांचे आयोजन केले जाते. या ९ दिवसांच्या कालावधीमध्ये महिला खूप जास्त आनंदी आणि खुश असतात. देवीची आराधना करताना अनेक ठिकाणी कुंकूमार्चन, कुमारिका पुजन, कुलाचार, भजन इत्यादी कार्यक्रम घेतले जातात. नवरात्रीचे नऊ दिवस महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवासाच्या कालावधीमध्ये काही सेवन केले जाते. पण काहीवेळा साबुदाणे किंवा इतर कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

संसर्गजन्य आजारांपासून कायमची मिळेल सुटका! ‘या’ पदार्थांनी आठवड्यातून दोनदा करा गुळण्या, रक्ताभिसरण सुधारण्यास होईल मदत

नवरात्रीच्या नऊ दिवस काही लोक खूप पदार्थांचे सेवन करून उपवास करतात. मात्र असे केल्यामुळे शरीरातील ऊर्जा काहीशी कमी होऊन जाते. शरीराची ऊर्जा कमी झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते आणि पचनासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नवरात्रीचा उपवास करताना कोणत्या चुका करू नयेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या गोष्टींची काळजी उपवास करताना घेतल्यास नऊ दिवस शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहील.

नवरात्रीचे उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

नवरात्रीसह इतर कोणत्याही दिवशी उपवास केल्यानंतर साबुदाण्याचे सेवन केले जाते. पण उपाशी पोटी साबुदाणे खाऊ नये. साबुदाणे खाल्यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात आणि पोटात गॅस, मळमळ, उलट्या किंवा डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवतात. साबुदाणे खाल्ल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते पण रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊन जाते आणि थकल्यासारखे वाटते. साबुदाण्यांमध्ये खूप जास्त स्टार्च असतात.

नऊ दिवस उपवास केल्यामुळे शरीरातील ऊर्जा काहीशी कमी कमी होऊन जाते. अशावेळी आहारात जास्तीतजास्त प्रमाणात कार्ब्स न खाता प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करावे. उपवासाच्या दिवसांमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करावे.

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, भगर, राजगिरा, बटाटे, रताळे, भाजणीचे थालीपीठ इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. तेच तेच पदार्थ खाल्यामुळे काहीवेळा कंटाळा येतो. त्यामुळे उपवास केल्यानंतर सुद्धा आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. उपवासाच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला जास्त पोषण मिळते.

उपवासाच्या दिवशी सर्वच पदार्थ बनवताना बटाटा वापरला जातो. पण रोज रोज बटाटा खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. बटाट्यामध्ये असलेल्या अतिरिक्त साखरेमुळे मधुमेहाचा धोका वाढतो आणि आरोग्य बिघडते. शरीरात स्टार्च वाढल्यामुळे शुगर सुद्धा वाढते. त्यामुळे कमीत कमी पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर करावा.

Navratri: नवरात्रीत घटवू शकता 5 किलो वजन, तळलेल्या पदार्थांपेक्षा फॉलो करा ‘हा’ Meal Plan, चरबी वितळेल क्षणात

बाजारात उपवासाच्या दिवशी खाऊ शकतो असे अनेक पॅकफूड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पण या पदार्थांमध्ये गरजेपेक्षा जास्त तेल, मीठ, इतर प्रिझर्व्हेटीव्हशरीरात जातात, ज्यामुळे आरोग्य बिघडते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Avoid making these mistakes during navratri fasting otherwise there will be serious health consequences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • benefits of fasting
  • Health Care Tips
  • Navratri

संबंधित बातम्या

झोपण्याआधी चावून खा आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली वेलची, संपूर्ण आरोग्याला होतील भन्नाट फायदे
1

झोपण्याआधी चावून खा आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली वेलची, संपूर्ण आरोग्याला होतील भन्नाट फायदे

शरीरावर वाढलेला लठ्ठपणा होईल महिनाभरात कमी! दैनंदिन जीवनात फॉलो करा या सवयी, चरबीचे थर होतील कायमचे नष्ट
2

शरीरावर वाढलेला लठ्ठपणा होईल महिनाभरात कमी! दैनंदिन जीवनात फॉलो करा या सवयी, चरबीचे थर होतील कायमचे नष्ट

वाढत्या थंडीत कायमच राहाल फिट आणि मजबूत! दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल, कधीच पडणार नाही आजारी
3

वाढत्या थंडीत कायमच राहाल फिट आणि मजबूत! दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल, कधीच पडणार नाही आजारी

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पदार्थाचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी
4

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पदार्थाचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.