
आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत
आतड्यांचा कॅन्सर कशामुळे होतो?
कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी काय खावे?
कॅन्सर होण्याची कारणे?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मधुमेह, हार्ट अटॅक, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालील जमीनच सरकते. मागील वर्षभरात कोलन कॅन्सर हा सगळ्यात सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सरपैकी एक बनला आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, आहारात वारंवार होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण तरुणांमध्ये झपाट्याने वाढताना दिसत आहे. पूर्वीच्या काळी हा आजार वयाच्या ६० व्या वर्षानंतर फार कमी लोकांमध्ये दिसून यायचा पण हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
आतडे शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. खाल्लेले अन्नपदार्थ पचन करणे, शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकणे इत्यादी अनेक गोष्टी आतडे करते. त्यामुळे शरीर सक्रिय असणे फार आवश्यक आहे. आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने लक्षणे वाढू लागतात आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात या पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थ आतड्यांचे आरोग्य शांतपणे सुधारतात आणि शरीराला आजारांपासून वाचवतात.
दैनंदिन आहारात वेगवेगळ्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा. मटकीची उसळ, पिठलं किंवा वरण-भात इत्यादी पदार्थ रोजच्या आहारात खावेत. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले सॅलड खाल्ल्यास पोट भरण्यासोबतच शरीराला आवश्यक असलेले पोषण मिळेल. रोज किमान १०० ग्रॅम कडधान्ये खाल्ल्यास कोलन कॅन्सरचा धोका २१ टक्क्यांनी कमी होतो. कडधान्य खाल्ल्यामुळे आतड्यांना सूज येत नाही. कुळीथ, मूग किंवा हरभऱ्याचा आहारात समावेश करावा.
दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही किंवा ताकाचे सेवन करावे. जेवणानंतर दही खाणे ही एक परंपरा आहे. यामुळे शरीरात थंडावा कायम टिकून राहतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरिया वाढवण्यासाठी दही आणि आंबवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. दह्याच्या सेवनामुळे आतड्याची ‘बॅरियर फंक्शन’ सुधारते आणि विषारी घटक रक्तात मिक्स होत नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान भागवण्यासाठी नाहीतर आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ताक किंवा दही खावे.
कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी लसूण फार उपयोगी आहे. सकाळी उठल्यानंतर नियमित एक लसूण पाकळी कच्ची चावून खाल्ल्यास कॅन्सरच्या पेशी नष्ट होण्यास मदत होईल. याशिवाय शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. लसूण खाल्ल्याने आतड्यातील हानिकारक जीवाणूंची वाढ थांबते, ज्यामुळे संसर्गाचा धोका टाळतो. त्यामुळे नियमित तुपात भाजलेली किंवा मधात मिक्स केलेली लसूण खावी.
Ans: मोठ्या आतड्यात (कोलन) किंवा मलाशयात पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यास आतड्यांचा कॅन्सर होऊ शकतो. वेळेवर तपासणी आणि योग्य जीवनशैलीमुळे धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
Ans: कमी फायबरयुक्त आहार, प्रक्रिया केलेले मांस, असंतुलित जीवनशैली, वाढते वय, कौटुंबिक इतिहास आणि काही आरोग्य समस्या यामुळे धोका वाढू शकतो.
Ans: शौचाच्या सवयींमध्ये बदल, सतत बद्धकोष्ठता किंवा जुलाब, पोटदुखी, शौचातून रक्त येणे, कारण नसताना वजन कमी होणे आणि सतत थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.