Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पानांचे सेवन, आतड्यांमधील चिकटलेला मल पडून जाईल बाहेर

कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यामुळे मधुमेह, बद्धकोष्ठता, अपचनाची समस्या दूर होतात. नियमित कडुलिंबाची २ किंवा ३ पाने चावून खाल्यास शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. जाणून घ्या कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 21, 2025 | 11:41 AM
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' हिरव्या पानांचे सेवन

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' हिरव्या पानांचे सेवन

Follow Us
Follow Us:

पूर्वीच्या काळी आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर आयुर्वेदिक पानांचे किंवा इतर वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जायचे.निर्सगातील वेगवेगळ्या वनस्पती, पाने, फुले आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक स्वतःच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देत नाहीत. आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे शरीराची पचनक्रिया लगेच बिघडू लागते. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे पोटात दुखणे, बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागते. पचनक्रिया बिघडल्यानंतर वारंवार ऍसिडिटी होणे, गॅस होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सगळ्यावर प्रभावी पाने म्हणजे कडुलिंब.(फोटो सौजन्य – istock)

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे बिघडू लागते डोळ्यांचे आरोग्य, दृष्टी कमी होऊन डोळे होतील कमजोर

कडुलिंबाच्या पानांचा वापर आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे नियमित दोन किंवा तीन कडुलिंबाची पाने चावून त्यावर गरम पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जाण्यास मदत होईल. याशिवाय शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस प्यावा. यामुळे शरीर डिटॉक्स होते. चला तर जाणून घेऊया कडुलिंबाच्या पानांचे फायदे.

कडुलिंबाच्या पानांचे शरीराला होणारे फायदे:

मधुमेह:

रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस प्यावा. कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीर सुधारण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही उपाशी पोटी कडुलिंबाची पाने चावून खाऊ शकता. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात राहील आणि रक्तातील साखर वाढणार नाही.

पोटाच्या समस्या:

पोट फुगणे, बद्धकोष्ठता, अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवू लागल्यास कडुलिंबाच्या पानांचे सेवन करावे. नियमित तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. विषारी घटक साचून राहिल्यामुळे पोटात घाण तशीच राहते, ज्यामुळे ऍसिडिटी किंवा गॅसची समस्या वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उपाशी पोटी २ कडुलिंबाची पाने चावून खावीत.

Uric Acid वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, दुर्लक्ष केल्यास उद्भवेल संधिवाताची समस्या

त्वचा स्वच्छ होते:

शरीर आतून डिटॉक्स करणे आवश्यक आहे. शरीरात साचलेल्या घाणीमुळे त्वचेवर पिंपल्स येणे, बारीक बारीक मुरूम किंवा फोड येऊ लागतात. यामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि विचित्र दिसू लागते. त्वचा खराब झाल्यानंतर पुन्हा एकदा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी.

FAQs (संबंधित प्रश्न)

कडुलिंबाचे फायदे काय आहेत?

कडुलिंबाच्या तेलात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने ते त्वचेवरील ॲक्ने, खाज, लालसरपणा कमी करण्यास मदत करते. कडुलिंबाचा रस केसांना लावल्यास कोंडा कमी होतो, केसगळती थांबते आणि केस चमकदार होतात.

कडुलिंबाचे दुष्परिणाम काय आहेत?

मळमळ, उलट्या किंवा अतिसार.काही लोकांना त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते.

कडुलिंबाबद्दल अधिक माहितीसाठी कोणाशी संपर्क साधावा?

तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा आयुर्वेदिक वैद्यांशी संपर्क साधू शकता. तसेच गरोदर माता किंवा मासिक पाळीच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांनी कडुलिंब खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these green leaves on an empty stomach after waking up in the morning neem benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • benefits of neem
  • diabetes
  • stomach health

संबंधित बातम्या

लहान वयात मोतीबिंदूचा धोका कशामुळे वाढतो? मधुमेह आहे मुख्य कारण, जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती
1

लहान वयात मोतीबिंदूचा धोका कशामुळे वाढतो? मधुमेह आहे मुख्य कारण, जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती

Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे
2

Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.