
पावसाळ्यात 'या' रानभाज्या खाण्याची संधी चुकवू नका; रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर येऊन नदी नाले मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहेत. पाऊस पडून गेल्यानंतर बाजारात आणि डोंगर भागांमध्ये विविध औषधी रानभाज्या आणि पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. वर्षातून एकदाच मिळणाऱ्या भाज्या खाण्यासाठी सगळेच खूप उत्सुक असतात. पालेभाज्यांच्या सेवनामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. तेवढेच फायदे रानभाज्या खाल्ल्यामुळे सुद्धा होतात.(फोटो सौजन्य – pinterest)
पावसाळा सुरू झाला की जंगल, डोंगर आणि शेतांच्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. या रानभाज्या चविष्ट तर असतातच, शिवाय अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात. ग्रामीण भागात या भाज्यांना विशेष महत्त्व आहे. मात्र रानभाज्या खाताना काळजी घ्यावी लागते. कारण चुकीची वनस्पती विषारी असू शकते. म्हणूनच रानभाज्यांची योग्य ओळख असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या भाज्या घेताना ओळखीच्या व्यक्तीकडूनच घ्याव्यात. रानभाज्या स्वच्छ पाण्यात अनेक वेळा धुवूनच वापराव्यात. तसेच चांगल्या प्रकारे शिजवून खाव्यात.
विटामिन ए आणि सीने समृद्ध कुडूंची भाजी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. पावसाळ्याच्या दिवसात दमट वातावरणामुळे विषाणू वाढतात. त्यामुळे संसर्गाचा धोकाही वाढतो. अशावेळी रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असल्यास आजाराचा धोका कमी असतो.
हलकी आणि पचायला सोपी भाजी असून पारंपरिक पद्धतीने ती बनवली जाते.चाकवत मद्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर मुबलक असते. भाजी, पराठे किंवा डाळीत चाकवत बनवतात.माठ विटामिन ए, सी आणि लोहाने समृद्ध भाजी आहे. नियमित आहारात समाविष्ट करण्यास आहे. दैनंदिन आहारात नियमित एक पालेभाजी खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच आरोग्य कायमच चांगले राहील. त्यामुळे वर्षातून एकदाच मिळणाऱ्या भाज्यांचे आवर्जून सेवन करावे.
अळूच्या पानापासून अळू वडी किंवा भाजी बनवतात. ही भाजी शिजवताना चिंच किंवा कोकम वापरल्यास खवखव कमी होते.ग्रामीण भागात तेरडा ही लोकप्रिय रानभाजी आहे. तेरडा ही पौष्टिक आणि चविष्ट भाजी आहे.पचनासाठी उपयुक्त मानली जाते. पारंपरिक आहारात विशेष स्थान.शेवळा काही भागांत पावसाळ्यात मिळणारी पारंपरिक रानभाजी आहे. स्थानिक पाककृतीमध्ये शेवळा वापरली जाते.
बांबूचे कोवळे कोंबपासून ही भाजी बनवली जाते. योग्य प्रक्रिया करून भाजी, लोणचे किंवा आमटीमध्ये वापरले जातात.टाकळा भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह, कॅल्शियम आणि फायबरचा चांगला सोत. भाजी, पातळ भाजी किंवा पिठल्यासोबत खाल्ली जाते.