Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? मग नैसर्गिक गोडवा असलेले ‘हे’ पदार्थ खाल्ल्यास वजन राहील नियंत्रणात, क्रेविंग होईल पूर्ण

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर साखरेचे सेवन करण्याऐवजी नैसर्गिक गोडवा असलेल्या फळांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. फळांच्या सेवनामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2026 | 07:43 AM
सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? मग नैसर्गिक गोडवा असलेले 'हे' पदार्थ खाल्ल्यास वजन राहील नियंत्रणात, क्रेविंग होईल पूर्ण

सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? मग नैसर्गिक गोडवा असलेले 'हे' पदार्थ खाल्ल्यास वजन राहील नियंत्रणात, क्रेविंग होईल पूर्ण

Follow Us
Follow Us:

साखर खाण्याची इच्छा का होते?
साखर खाल्ल्यास शरीरावर होणारे दुष्परिणाम?
साखरेऐवजी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?

वाढलेले वजन, मधुमेह, हृदयविकार, वाढलेले कोलेस्ट्रॉल इत्यादी शरीरसंबंधित गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. पण तरीसुद्धा फारसा बदल शरीरात दिसून येत नाही. आपल्यातील अनेकांना कायमच गोड, तिखट, चटपटीत आणि रोजच्या आहारात विकतचे पदार्थ खाण्याची खूप जास्त सवय असते. याच चुकीच्या सवयीचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. वारंवार गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर मिठाई किंवा साखरेपासून बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे अतिशय आवडीने सेवन केले जाते. मात्र हेच पदार्थ शरीर आतून पोखरून अशक्त करून टाकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कोणत्या नैसर्गिक गोडवा असलेल्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहण्यासोबतच मधुमेह सुद्धा नियंत्रणात राहील.(फोटो सौजन्य – istock)

Menstrual Migraine म्हणजे काय? मासिक पाळीतील वेदना आणि असह्य डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

ताजी फळे किंवा फ्रूट प्युरी:

दैनंदिन आहारात नियमित एक फळ खाण्याचा सल्ला डॉक्टर कायमच देत असतात. ताज्या फळांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे नियमित एक तरी फळ खावे. सफरचंद, पेरू, केळी इत्यादी फळांमध्ये असलेला नैसर्गिक गोडवा झपाट्याने रक्तातील साखर वाढवत नाही आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. शिरा किंवा पॅनकेक बनवताना त्यामध्ये पिकलेली केळी मॅश करून टाकावीत. आहारात फायबर युक्त फळांचे सेवन केल्यास पचनक्रिया मजबूत राहते.

खजूर:

सकाळच्या नाश्त्यात नियमित एक किंवा दोन खजूर खावेत. खजूरमध्ये असलेल्या नैसर्गिक गोडव्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी झपाट्याने वाढत नाही. यामध्ये ६० ते ७०% नैसर्गिक साखर असते. त्यामुळे नियमित १ किंवा २ खजूर आवर्जून खावेत. यामध्ये असलेले लोह, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला तात्काळ ऊर्जा देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ड्रायफ्रूट लाडू, एनर्जी बार किंवा खीर बनवताना त्यात पांढऱ्या साखरेचा वापर करण्याऐवजी खजूर वापरावे.

पुरुषांनो सावधान! वंध्यत्वाची ‘ही’ लक्षणे दिसताच चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा वाढेल Infertility चा धोका

गूळ:

नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले गूळ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. बऱ्याचदा घरात वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ बनवण्यासाठी साखरेचा वापर करण्याऐवजी गुळाचा वापर करावा. गुळामध्ये लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे नियमित एक ग्लास दुधात अर्धा चमचा गूळ मिक्स करून प्यावे. यामुळे शरीरास आवश्यक असलेले लोह मिळेल. अ‍ॅनिमिया किंवा वात दोषाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात गुळाचा समावेश करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सतत गोड खाण्याची इच्छा का होते?

    Ans: अपुरी झोप, ताणतणाव, असंतुलित आहार, रक्तातील साखरेतील चढ-उतार किंवा काही पोषणतत्त्वांची कमतरता यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा वारंवार होऊ शकते.

  • Que: गोड खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी कोणते नैसर्गिक पदार्थ खाऊ शकतो?

    Ans: ताजी फळे, खजूर, मनुका, अंजीर यांसारखे नैसर्गिक गोडवा असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास गोड खाण्याची इच्छा काही प्रमाणात कमी होऊ शकते.

  • Que: गोड पदार्थ पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे का?

    Ans: बहुतेक लोकांसाठी गोड पदार्थ पूर्णपणे टाळण्याऐवजी मर्यादित प्रमाणात आणि संतुलित आहारासह सेवन करणे अधिक व्यवहार्य ठरते.

Web Title: Eating these foods which offer natural sweetness will help keep your weight under control while satisfying your cravings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 07:43 AM

Topics:  

  • fruit
  • Health Care Tips
  • how to cure Diabetes

संबंधित बातम्या

Menstrual Migraine म्हणजे काय? मासिक पाळीतील वेदना आणि असह्य डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
1

Menstrual Migraine म्हणजे काय? मासिक पाळीतील वेदना आणि असह्य डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

लहान वयात मोतीबिंदूचा धोका कशामुळे वाढतो? मधुमेह आहे मुख्य कारण, जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती
2

लहान वयात मोतीबिंदूचा धोका कशामुळे वाढतो? मधुमेह आहे मुख्य कारण, जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती

सुखी जीवनाचे रहस्य! ‘या’ सकारात्मक विचारांनी बदलून जाईल आयुष्याचा दृष्टिकोन, राहाल कायमच आनंदी
3

सुखी जीवनाचे रहस्य! ‘या’ सकारात्मक विचारांनी बदलून जाईल आयुष्याचा दृष्टिकोन, राहाल कायमच आनंदी

आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचे पाणी, शरीराला होतील भरमसाट फायदे
4

आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचे पाणी, शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.