
ओल्या कचऱ्याच्या घाणेरड्या दुर्गंधीमुळे शरीराला होईल 'या' संसर्गजन्य आजारांची लागण, दुर्गंधी ठरेल जीवघेणी
कचऱ्याच्या घाणीमुळे शरीराला कोणत्या आजारांची लागण होते?
बचाव करण्यासाठी कोणते उपाय?
ओल्या कचऱ्याला घाणीचा वास का येतो?
मुंबईसह संपूर्ण देशभरात छोट्या झोपड्या सगळीकडेच पहायला मिळतात. झोपडं पट्यांमधील अपुरी व्यवस्था शरीरासाठी घातक तर काहीवेळा जीवघेणी सुद्धा ठरू शकते. मुंबईमध्ये अनेक झोपडपट्यांच्या बाजूलाच कचऱ्याची मोठी मोठी मैदाने आहेत. लहान मोठ्या चाळींपासून ते अगदी मोठं मोठ्या टॉवरमध्ये जमा झालेला कचरा डंपिंग मैदानावर आणून टाकला जातो. तर काही ठिकाणी झोपडं पटण्याच्या आजूबाजूला असलेल्या नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो. हा कचरा छोट्या नाल्यांमधून पुढे सरकून न जाता तिथेच साचून राहतो आणि घाणीचे साम्राज्य निर्माण होते. मोठ्या कंपनींमधील कचरा सुद्धा नाल्यांमध्ये टाकला जातो. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे घाण होते आणि ओला कचरा जास्त दिवस तसाच साचून राहिल्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो.(फोटो सौजन्य – istock)
कचऱ्याच्या घाण दुर्गंधीमुळे शरीराला संसर्गजन्य आजारांची लागण होऊ शकते. ओल्या कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी शरीरासाठी अतिशय त्रासदायक ठरते. कचऱ्यात भाजीपाला, अन्नाचे उरलेले तुकडे, मांस, घरातील इतर वस्तू सुद्धा टाकल्या जातात. हे पदार्थ कुजल्यानंतर त्यात भागात मच्छर होतात आणि संपूर्ण परिसर दूषित होऊन जातो. कचऱ्याच्या घाणीमुळे झालेले आजार लवकर बरे होत नाही. त्यामुळे शरीराची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे शरीराला कोणत्या आजारांची लागण होते.
ओला कचरा सडल्यानंतर त्यातून अमोनिया, हायड्रोजन स्लफाईड आणि मिथेन यांसारखे विषारी वायू बाहेर पडतात. हे वायू आजूबाजूच्या वातावरणात पसरल्यामुळे नाक आणि श्वसनावाटे शरीरात प्रवेश करतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने फुफ्फुसांना सूज येणे, खोकला, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
कचऱ्यातून येणाऱ्या घाण वासामुळे डोके दुखणे, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे किंवा मळमळ झाल्यासारखे वाटते. वारंवार उलटीसारखं वाटल्यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो. ओल्या कचऱ्यात प्रामुख्याने घरातील भाजीपाला आणि अन्नाचे कण टाकले जाते. हे घाण पदार्थ खाण्यासाठी कचरा टाकलेल्या भागात माश्या, डास, उंदीर आणि झुरळांचे प्रमाण वाढते. हे जंतू स्वयंपाक घरात गेल्यानंतर कॉलरा, टायफॉइड डेंग्यू, मलेरिया आणि अतिसार यांसारखे गंभीर आजार होतात.
सत्त्व कचऱ्याच्या दुर्गंधीमध्ये राहिल्यामुळे शारीरिक तणावासोबतच मानसिक तणाव सुद्धा वाढतो. घाणीच्या वासामुळे व्यवस्थित झोप न होणे, सतत चिडचिड, नैराश्य येण्याची शक्यता असते. याशिवाय डोळ्यांचे विकार, त्वचा रोग होऊन संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे घराच्या आजूबाजूला जास्त कचरा करू नये. आजूबाजूचा परिसर कायमच स्वच्छ ठेवावा.
Ans: ओल्या कचऱ्यात बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी वाढतात. या जंतूंमुळे हवा दूषित होते आणि त्यातून संसर्गजन्य आजार पसरू शकतात.
Ans: टायफॉईड, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया, त्वचारोग आणि श्वसनाचे आजार होण्याचा धोका वाढतो.
Ans: ओल्या कचऱ्याजवळ पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होते, ज्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार पसरतात.