नैवेद्य कधी खावा (फोटो सौजन्य - ChatGPT)
देवाला नैवेद्य अर्पण करून नंतर प्रसाद ग्रहण करावा हे तर सर्वज्ञात आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाच्या २६ व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की,
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति
याचा अर्थ असा आहे की, जर भक्ताने शुद्ध भावनेने पाने, फुले, फळे किंवा पाणी अर्पण केले, तर देव ते स्वीकारतो. हा श्लोक नैवेद्याच्या प्रमाणापेक्षा किंवा किंमतीपेक्षा भक्ताच्या भक्तीवर आणि भावनांच्या शुद्धतेवर भर देतो.
Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया
शास्त्राच्या श्लोकांमध्ये किती वेळानंतर नेवैद्य समोरून उचलावा हे सांगण्यात आलं नाहीये. पूजेची पद्धत, देवता, पंथ आणि कौटुंबिक परंपरेनुसार वेळ बदलू शकतो. पण सर्वसाधारण घरगुती पूजेमध्ये क्रम पाळला जाऊ शकतो. आता तो क्रम कोणता तर
Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी
पूजेनंतर दूध, खीर, हलवा किंवा इतर नाशवंत प्रसाद स्वच्छ, झाकण असलेल्या भांड्यात फ्रिजमध्ये ठेवता येतो. प्रसाद मुद्दाम खराब करण्याविरुद्ध शास्त्रे काही सांगत नाहीत. अन्नाचा आदर करणे म्हणजे ते स्वच्छ ठेवणे, वेळेवर सेवन करणे आणि वाया न घालवणे. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब जेवढे खाऊ किंवा वेळेवर वाटू शकेल, तेवढेच देवाला अर्पण करणे उत्तम.
अर्पणाचा खरा अर्थ म्हणजे ताट देवापुढे किती वेळ राहते हा नाही. गीतेनुसार, त्याच्या मुळाशी भक्ताच्या शुद्ध भावना आहेत. म्हणून, भक्तीभावाने अर्पण करा, पूजा पूर्ण झाल्यावरच ते सेवन करा आणि अन्नाची स्वच्छता राखा.






