
फोटो सौजन्य - Social Media
अलिबाग म्हणजे स्वर्ग! आणि स्वर्ग म्हणजे अलिबाग! आपल्याला मुंबईहून जवळ स्वर्ग अनुभवायचा असेल तर आपल्या डोक्यात पहिले ठिकाण आपसूक येते ते म्हणजे अलिबाग! अलिबाग एक सुंदर समुद्रकिनारा आहे. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी काही असे ही ठिकाणं आहेत, जिथे अदृश्य शक्ती आजही तितक्याच प्रबळ आहेत. अशीच एक दंतकथा अलिबाग क्षेत्रात प्रसिद्ध आहे. अलिबागच्या कार्ले खिंड परिसरातील जंगलात या गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत कारण त्या तिथे नेहमी घडतच असतात.
एकदा मकरंद नावाचा रिक्षाचालक आपली ऑटो रिक्षा घेऊन रात्रीचे 1 वाजता या परिसरात भाडं सोडून नवीन भाडे शोधात होतात तेव्हा या जंगलात दूरवर एक निर्जीव मानवी आकृती याला बोलावताना दिसली. मकरंदला वाटले की भाडे आहे तर जाऊन बघू. तो निर्जीव व्यक्ती अचानक त्याच्या ऑटोच्या जवळ येऊन पोहचला आणि त्याला म्हणाला “मला घरी सोडाल का?” मकरंदच्या ऑटोमध्ये मागे तो बसला आणि ऑटो सुरु झाली. अवघ्या काही सेकंदात त्या व्यक्तीने मकरंदच्या खांदयावर हात ठेवला आणि म्हणाला गाडी थांबावं. मकरंदने लगेच गाडी थांबवली, तितक्यात तो व्यक्ती रस्त्या शेजारील जंगलाच्या दिशेने पळू लागला. मकरंदी त्याच्यामागे पळू लागला. जंगलातून मकरंदला रडण्याचा आवाज येऊ लागला. मकरंद आणखीन आत जाऊन पाहतो तर काय तिथे त्याच व्यक्तीचा मृतदेह होता. अचानक रडण्याचा आवाज येणे बंद झाले होते. मकरंद पळत पुन्हा आपल्या ऑटोकडे आला. भयंकर म्हणजे त्या ऑटोमध्ये तेव्हाही तोच व्यक्ती त्याच ठिकाणी बसला होता.
मकरंद घाबरून रिक्षा सुरु करतो. मागचा व्यक्ती त्याला पत्ता सांगत असतो. दरम्यान, मध्येच अचानक एक विचित्र गोष्ट मकरंदला दिसते. त्यावेळी त्या ऑटो शेजारून जाणाऱ्या प्रत्येक ऑटोमध्ये मकरंदला तोच व्यक्ती दिसत असतो जो त्याच्या ऑटोमध्ये बसलेला असतो. मकरंद घाबरत त्या व्यक्तीला त्याच्या घरापर्यंत सोडतो. घर येताच तो व्यक्ती घराकडे असा धावत सुटतो जणू अनेक दशकांच्या काळानंतर तो त्याच्या घरी आलाय, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मकरंद पाहू शकत होता पण दारापर्यंत पोहचताच तो व्यक्ती अचानक हवेत गायब होऊन जातो. मकरंद त्या घराचा दार ठोठावतो. आतमध्ये एक म्हातारी बसलेली असते, म्हातारी दार उघडते आणि मकरंदला आत घरामध्ये तो व्यक्ती कुठेच दिसत नाही. भितींवर त्या व्यक्तीचा फोटो टांगलेला असतो. मकरंद घाबरून जातो तेव्हा ती म्हातारी त्याला सांगते की ‘तो माझा मुलगा आहे. 20 वर्षांपूर्वी कार्ले खिंडात त्याचा अपघात झाला. तो मेला! जखमी अवस्थेत सगळ्यांकडे मदत मागू लागला. कुणी मदत केली नाही शेवटी तो त्या जंगलात जाऊन स्वतःचा जीव सोडला. बाळा, तू एकटा नाहीस. गेल्या 20 वर्षांपासून असे अनेक रहदार , ऑटो वाले घरी येत असतात. तो तिथेच भटकतोय. आजही!”
हे ऐकून मकरंद त्याच्या घरी परतण्यासाठी ऑटोकडे वळतो आणि रिक्षात पाहून त्याची बोबडीच वळते. आत त्या म्हातारीचा मुलगा बसलेला असतो.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर
हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)