
उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर त्वचा खूप जास्त टॅन झाल्यासारखी वाटते आणि चेहऱ्यावर घामामुळे तेलकटपणा आणि चिकटपणा वाढू लागतो. चेहऱ्यावर वाढलेले अतिरिक्त तेल त्वचेचे गंभीर नुकसान करून टाकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे. चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल त्वचेमध्ये तसेच साचून राहिल्यामुळे पिंपल्स, मुरूम आणि त्वचेसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये जास्त लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या आणखीनच वाढू लागतात आणि त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश
उन्हाळ्यात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर घाम, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे चेहऱ्यावर घाण साचून राहण्यास सुरुवात होते. त्वचेवर वाढलेला चिकटपणा कमी करण्यासाठी वारंवार चेहरा पाण्याने स्वच्छ केला जातो. यामुळे त्वचेवरील घाण स्वच्छ होते, पण त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये त्वचा व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया दिवसभरात किती वेळा त्वचा पाण्याने स्वच्छ करावी.
आपल्यातील अनेकांना कायमच चेहऱ्यावर पाणी मारण्याची सवय असते. सतत चेहरा पाण्याने किंवा फेस वॉश करून धुतल्यामुळे चेहऱ्यावरील आवश्यक तेल नष्ट होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त कोरडी होते. त्वचेतील नॅचरल ऑइल कमी झाल्यामुळे स्किनची पीएच लेव्हल बिघडून जाते. त्यामुळे दिवसभरात दोनदा किंवा तीनदाच चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. चेहऱ्यावर सतत फेसवॉश लावू नये. जास्त वेळा फेसवॉश केल्यामुळे चेहरा कोरडा पडण्यासोबतच ताणलेला आणि संवेदनशील होऊन त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन जाते. त्वचेमधील तेल कमी झाल्यानंतर चेहऱ्यावरील ग्लो नष्ट होऊन जातो. यामुळे त्वचा अधिकच तेलकट होऊन पिंपल्स येतात.
तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण
दिवसातून एकदा किंवा दोनदाच चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. सतत चेहरा धुतल्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू लागतात. सकाळी उठल्यानंतर, दुपारच्या वेळी आणि रात्री झोपण्याआधी चेहरा फेसवॉश करून स्वच्छ करावा. याशिवाय तेलकट त्वचा असल्यास जेलबेस फेशवॉशचा वापर करावा. तसेच जास्त घाम किंवा धूळ मातीच्या संपर्कात गेल्यानंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ करावी. फेसवॉश निवडताना त्वचेला सूट होईल अशाच फेसवॉशची निवड करावी. हानिकारक केमिकल असलेले फेसवॉश वापरू नये.