
उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वच महिला उपवास करतात. उपवासाच्या दिवशी घरात साबुदाणा खिचडी, वडा, भगर किंवा इतर पदार्थ खाल्ले जातात. पण उपाशी पोटी साबुदाणा खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवास केल्यानंतर आहारात साबुदाणे अजिबात खाऊ नये. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही बटाटा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला दही बटाटा चवीला अतिशय सुंदर लागतो. दही खाल्ल्यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो आणि बटाटा खाल्ल्यामुळे पोट भरते, लवकर खाण्याची इच्छा होत नाही. उपवास केल्यानंतर नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात कोणतेही तेलकट पदार्थ खाऊ नये. चिप्स किंवा बटाट्याचे पापड खाल्ल्यामुळे ऍसिडिटी वाढते. त्यामुळे दही बटाटा खाणे फायदेशीर ठरेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)