
उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम
नारळ पाणी पिण्याचे फायदे?
शिळे नारळ पाणी पिण्याचे दुष्परिणाम?
नारळ पाणी पिण्याआधी कोणती काळजी घ्यावी?
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर थंड पेयांच्या मागणीमध्ये मोठी वाढ होते. कारण कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळी पेय प्यायली जातात. त्यात वर्षाच्या बाराही महिने मिळणारे पेय म्हणजे नारळ पाणी. गोड चवीचे नारळ पाणी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं प्यायला खूप जास्त आवडते. शरीर आतून हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीराला तात्काळ ऊर्जा देण्यासाठी नारळ पाणी प्यायले जाते. नारळ पाणी प्यायल्यामुळे केवळ शरीरालाच नाहीतर त्वचेलासुद्धा भरमसाट फायदे होतात. यामुळे चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा येईल. पण बऱ्याचदा नारळ पाणी आणल्यानंतर त्यातील पाणी काढून फ्रिजमध्ये किंवा बाहेर असेच ठेवले जाते. तहान लागल्यानंतर उघडल्यावर असलेल्या सरबतच्या गाडीवरून काहीवेळा नारळ पाणी सुद्धा प्यायले जाते. पण शिळे नारळ पाणी शरीरासाठी विष ठरू शकते. चुकूनही उघड्यावर किंवा बाटलीमध्ये भरून ठेवलेले शिळे नारळ पाणी पिऊ नये. शिळे झाल्यानंतर त्याचे रूपांतर विषारी पेयांमध्ये होते. चला तर जाणून घेऊया शिळे नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम.(फोटो सौजन्य – istock)
नारळ पाणी विकत आणल्यानंतर ते जास्त वेळ ठेवल्यास त्यात विषारी घटक तयार होण्यास सुरुवात होते. हानिकारक बॅक्टेरिया वेगाने वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. मळमळ, उलट्या, जुलाब आणि पोटातील वेदना इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. खराब नारळ पाण्यात तयार झालेले विषाणू पचनक्रिया बिघडून आतड्यांमध्ये इन्फेक्शन वाढवतात, ज्याच्या परिणामामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होत नाहीत. त्यामुळे नारळ पाणी आणल्यानंतर ते अर्धा तासाच्या आधीच प्यावे. जास्त शिळे झालेले पाणी घरातील इतर व्यक्तींना अजिबात पिण्यास देऊ नये.
शिळ्या नारळ पाण्यात 3-nitropropionic acid असलेले विषारी घटक झपाट्याने तयार होतात. यामुळे चक्कर येणे, गोंधळल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तर काहीवेळा शरीरातील नसांचे नुकसान होते. नारळ पाण्यातील बुरशीजन्य विषारी घटकांमुळे फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होण्यास सुरुवात होते. फुफ्फुसांमध्ये जमा झालेल्या पाण्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय शरीराला गंभीर आजाराची लागण सुद्धा होऊ शकते. बऱ्याचदा नारळ पाणी शिळे झाल्यानंतर त्याचा वास बदलतो. त्यामुळे नारळ पाणी पिताना शंका निर्माण झाल्यास वेळीच सावध व्हावे.
अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते ‘या’ गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय
खराब आणि शिळ्या झालेल्या नारळ पाण्याच्या सेवनामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. कारण काही प्रकरणांमध्ये नारळ पाणी प्यायल्यानंतर मेंदूमध्ये संसर्ग होऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कायमच ताजे नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी पिताना त्यांचा रंग पिवळसर किंवा वास येत असल्यास नारळ पाणी अजिबात पिऊ नये.
Ans: नाही, उघड्यावर ठेवलेले नारळ पाणी काही तासांत खराब होऊ शकते आणि त्यात जीवाणू वाढू शकतात.
Ans: सामान्यतः उघडल्यानंतर 2-3 तासांत नारळ पाणी खराब होण्यास सुरुवात होते, विशेषतः उष्ण वातावरणात.
Ans: नारळ पाणी उघडल्यानंतर लगेच पिणे उत्तम. साठवायचे असल्यास ते फ्रिजमध्ये ठेवावे आणि 24 तासांत वापरावे.