
मासिक पाळीतील हेवी ब्लीडिंगमुळे लोहाची कमतरता निर्माण झाली आहे? थकवा कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
लोहाच्या कमतरतेची गंभीर लक्षणे कोणती?
मासिक पाळीच्या चक्रात बदल कशामुळे होतो?
लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावे?
सर्वच महिलांना महिन्यातील ४ ते ५ दिवस मासिक पाळी येते. मासिक पाळी येणे ही शरीरातील नैसर्गिक क्रिया आहे. पाळी येण्याच्या काही दिवस आधी शरीरात अनेक बदल दिसून येतात. कंबर दुखणे, पोटात वेदना होणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे इत्यादी अनेक त्रासांना समोर जावे लागते. हेवी ब्लीडींग झाल्यामुळे महिलांना शरीरसंबंधित असंख्य समस्या उद्भवू लागतात. जास्त ब्लीडींग झाल्यामुळे शरीर आतून पोखरले जाते आणि शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि खूप जास्त थकवा वाढतो. त्यामुळे आहारात बदल करून शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळी दरम्यान गर्भाशयाच्या आतील थरला (एंडोमेट्रियम) गर्भधारणा झाली नाही तर, तुटून शरीराबाहेर पडतो. ३ ते ५ दिवसांच्या कालावधीमध्ये रक्तस्रावाच्या स्वरूपात बाहेर पडून जाते. या दिवसांमध्ये सामान्यतः ३० ते ८० मिलीलीटर इतका रक्तस्राव महिलांच्या शरीरातून होतो. पण काही महिलांमध्ये ८० मिलीलीटर पेक्षा जास्त रक्तस्त्राव झाल्यानंतर शरीरसंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या स्थितीला हेवी ब्लीडींग असे म्हंटले जाते. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरातील लोहाची पातळी झपाट्याने कमी होऊन जाते आणि ज्यामुळे रक्ताल्पता किंवा ॲनिमियासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
मासिक पाळी दरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. अशा महिलांनी शरीराची विशेष काळजी घेणे फार आवश्यक आहे. ‘आयरन-फॉलिक ॲसिड’ इत्यादी गोळ्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे. या गोळ्या लोहाची पातळी वाढवण्यास मदत करतात. रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात नेहमीच पालेभाज्या आणि इतर हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. तसेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बीट आणि गाजराचा रस प्यावा. डाळिंबाचे सेवन केल्यामुळे रक्त वाढण्यासोबतच रक्त शुद्ध होण्यास सुद्धा मदत होते. रोजच्या जेवणात डाळी, राजमा आणि चणे इत्यादी कढधान्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात वाढलेला थकवा कमी होण्यास मदत होईल. चहा कॉफी बनवताना त्यात साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. गुळाच्या सेवनामुळे शरीरात लोहाची पातळी वाढते.
Ans: हार्मोन्समध्ये असंतुलन, गर्भाशयातील समस्या (फायब्रॉइड्स), थायरॉईड किंवा काही औषधांच्या परिणामामुळे जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.
Ans: जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने शरीरातील लोह (Iron) कमी होते, ज्यामुळे अॅनिमिया होण्याचा धोका वाढतो.
Ans: पालक, मेथी, बीट, डाळी, खजूर, किसमिस, डाळिंब, अंडी आणि मांस यांसारखे आयर्नयुक्त पदार्थ खावेत.