
कडधान्य भिजवताना केलेल्या 'या' चुकांमुळे आतड्यांना पोहचेल हानी, अपचनाच्या समस्या वाढून उद्भवतील गंभीर आजार
अन्नपदार्थ भिजवून खाण्याचे फायदे?
अन्नपदार्थ भिजवून खाणे का आहे गरजेचे?
कढधान्य किंवा डाळी खाण्याचे फायदे?
दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जातात. आहारात कधी कडधान्य खाल्लं जात तर कधी पालेभाज्या, फळे आणि सुकामेवा इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. सकाळच्या नाश्त्यात भिजवलेले बदाम खाल्ल्यास शरीराला फायदे होतात. पण कामाच्या धावपळीमध्ये बदाम पाण्यात भिजलं घालवण्याची आठवण राहत नाही. पण डाळी, कडधान्ये, सुका मेवा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बिया भिजवूनच खाव्यात. अन्यथा पचनसंस्थेवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. तासनतास अन्नपदार्थ पाण्यात भिजवून ठेवण्याची परंपरा फार जुनी आहे. त्यामुळे अन्नपदार्थांचे सेवन करताना योग्य पद्धत फॉलो करावी. अन्नपदार्थ भिजवून खाल्ल्यामुळे ते सहज पचन होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)
LDL cholesterol: बाहेरच खात नाही तरी खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय? तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?
भिजवलेल्या डाळी किंवा सुकामेवा खाल्ल्यास शरीरातील पोषणतत्त्वांचे शोषण होते आणि अन्नाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. डाळी, कडधान्ये, बदाम, चिया सीड्स, मनुके आणि अंजीर यांसारखे पदार्थ भिजवून खाल्ल्यास शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि पदार्थांची गुणवत्ता वाढते. आज आम्ही तुम्हाला कोणते पदार्थ न भिजवता खाल्ल्यास पचनसंस्थेवर जास्तीचा तणाव येऊ शकतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे अपचनाच्या समस्या वाढून ऍसिडिटी वाढते.
वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये फायटिक ॲसिड आणि टॅनिन्स, एंझाइम इनहिबिटर्स यांसारखी विशिष्ट घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हे घटक वाढीच्या काळात बियांचे आणि धान्याचे रक्षण करतात. पण न भिजवता कढधान्य, डाळी किंवा सुकामेवा खाल्ल्यास लोह, जस्त, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या आवश्यक घटकांचे योग्य शोषण होत नाही. तसेच कडक अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. अधर्वट शिजवलेले किंवा कच्चे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात गॅस वाढतो. त्यामुळे कढधान्य, डाळी किंवा इतर सुकामेवा, बिया भिजवूनच खाव्यात.
रोजच्या स्वयंपाकासाठी घरात वेगवेगळे पदार्थ आणले जातात. त्यातील काही पदार्थ थेट कुकरच्या भांड्यात शिजवून खाल्ले जातात. पण यामुळे अपचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. राजमा, छोले, उडीद, अख्खे मूग, वाटाणे आणि सोयाबीन, सुकामेवा, चिया सीड्स, जवस, सब्जा बिया, मनुके, सुके अंजीर इत्यादी पदार्थ थेट खाऊ नये. रात्रभर किंवा दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवल्यानंतरच खावे. भिजवून खाल्लेल्या पदार्थांमध्ये आवश्यक फायबर युक्त घटक असतात. ज्याचा परिणाम शरीरावर लगेच होतो.
Ans: कडधान्य भिजवल्याने ते मऊ होतात आणि शिजण्यास कमी वेळ लागू शकतो. योग्य पद्धतीने भिजवल्यास काही लोकांमध्ये कडधान्यांमुळे होणारा गॅस किंवा पोटफुगी कमी होण्यासही मदत होऊ शकते.
Ans: कडधान्य न धुता भिजवणे, खूप वेळ खोलीच्या तापमानावर ठेवणे, भिजवलेले पाणी न बदलणे किंवा खराब वास येत असतानाही ते वापरणे टाळावे. भिजवण्याची पद्धत कडधान्याच्या प्रकारानुसार बदलू शकते.
Ans: कडधान्याच्या प्रकारानुसार वेळ वेगवेगळा असतो. हरभरा, राजमा यांसारख्या मोठ्या कडधान्यांना साधारण ८–१२ तास भिजवावे लागू शकते, तर मसूर डाळीसारख्या डाळींना तुलनेने कमी वेळ पुरतो.