
बाजारातून आणलेल्या फळे आणि भाज्या स्वच्छ धुवाव्यात. मात्र, साठवण्यापूर्वी त्यावरील पाणी पूर्णपणे कोरडे करणे आवश्यक आहे. अतिरिक्त ओलावा राहिल्यास बुरशी आणि जीवाणूंची वाढ वेगाने होऊ शकते. स्वच्छ कापड किंवा किचन टॉवेलने पुसून त्या कोरड्या केल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवाव्यात.
हिरव्या पालेभाज्या कागदी टॉवेलमध्ये गुंडाळून किंवा हवा खेळती राहील अशा पिशवीत ठेवल्यास त्यातील अतिरिक्त ओलावा शोषला जातो आणि त्या अधिक काळ ताज्या राहतात. फळे आणि भाज्या एकाच ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठेवणेही फायदेशीर ठरते, कारण काही फळांमधून बाहेर पडणारा इथिलीन वायू भाज्या लवकर खराब करू शकतो.
सर्व फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. बटाटे, कांदे आणि टोमॅटो थंड, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवले तर त्यांची चव आणि गुणवत्ता टिकून राहते. मात्र पालेभाज्या, गाजर, ब्रोकोली यांसारख्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवणे अधिक योग्य ठरते.
एका खराब झालेल्या फळामुळे किंवा भाजीमुळे इतर ताज्या पदार्थांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे साठवलेले फळे-भाज्या नियमित तपासा आणि खराब झालेला पदार्थ लगेच वेगळा काढा. यामुळे उर्वरित पदार्थ अधिक काळ सुरक्षित राहतात.
कापलेली फळे किंवा भाज्या जास्त वेळ बाहेर ठेवल्यास त्यावर जीवाणूंची वाढ होण्याचा धोका वाढतो. अशा पदार्थांना हवाबंद डब्यात ठेवून शक्य तितक्या लवकर फ्रिजमध्ये ठेवावे. यामुळे त्यांचा ताजेपणा आणि सुरक्षितता दोन्ही टिकून राहतात.
पावसाळ्यात फळे-भाज्या योग्य प्रकारे साठवणे ही केवळ स्वच्छतेची बाब नसून आरोग्याचीही गरज आहे. योग्य तापमान, कमी ओलावा आणि स्वच्छ साठवण यांचा अवलंब केल्यास अन्न वाया जाणे कमी होते आणि कुटुंबाला ताजे व सुरक्षित अन्न मिळण्यास मदत होते.
Bad Cholesterol: हेल्दी लाइफस्टाइल असूनही वाढतंय खराब कोलेस्ट्रॉल? जाणून घ्या खरी कारणं