
पावसाळ्यात नकळत करता का या 5 चुका? पायांपासून वाढू शकतो संसर्गाचा धोका; वेळीच व्हा सावध
पायांमध्ये चप्पल न घालणे
पावासाळ्याच्या दिवसांत रबरी चप्पल घालणे पायांसाठी चांगले ठरते. परंतु अनेकजण पावासाळ्याच्या दिवसांत जवळच्या गल्लीत किंवा आसपासच्या ठिकाणी जाताना पायात चप्पल घालत नाही तर अनवाणीच चालतात. यानंतर त्याच ओल्या आणि घाण पायांनी घरात प्रवेश घेतला जातो. यामुळे घरात जंतूचा धोका वाढतो. डर्मेटोलॉजिस्टच्या मते, रबरी चप्पल आपल्या पायांना कोरडी ठेवण्यास मदत करते. यामुळेच गार्डन, बाथरुम किंवा घराच्या आसापासच्या ठिकाणी जाताना नेहमी पायांत रबरी चप्पल घालावी.
पावासाळ्यात लेदर शूज घालणे
ऑफीस जाण्यासाठी अनेकदा काहीजण पावसाच्या दिवसांतही पायांत लेदरचे शूज घालतात. परंतु ही सवय फंगल इंफेक्शनचा धोका वाढवू शकते. लेदरच्या चप्पलांमध्ये बॅक्टेरिया आणि ओलावा शोषला जातो ज्यामुळे जेव्हाही तुम्ही हे शूज घालाल तेव्हा ते यातील बॅक्टेरिया तुमच्या पायांवर जमा होऊ लागतील. हेच कारण आहे पावसाळ्याच्या दिवसांत लेदर शूज घालण्यास मनाई केली जाते.
मोजे घालण्यासाठी पायांना पुसा
आपले पाय कितीही कोरडे असले तरी पायांमध्ये मोजे घालण्याआधी त्यांना एकदा तरी कपड्याने चांगले पुसा. पायांची बोटांवर, नखांवर बऱ्याचदा ओलावा साचलेला असतो ज्यामुळे फंगल इंन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
नखांना लहान ठेवणे
पायांच्या नखांना गरजेपेक्षा जास्त लहान कापणे म्हणजे स्वच्छता राखणे होत नाही. खरंतर तुमच्या या सवयीमुळे बॅक्टेरिया आणि जर्म्सना खुले आमंत्रण मिळत असते. पायांची नखे जास्त लहान असल्यास त्यांच्या आत घाण आणि बॅक्टेरिया सहजपणे घुसतात. यामुळे सूज, वेदना होण्याची शक्यता असते. यामुळेच नखे फार लहान कापू नयेत.
रोज एकच बूट वापरणे
पावसाळ्यात शूज वापरणे खरंतर टाळायला हवं. पावसात पाय भिजत असल्याने त्यांना सुकण्यासाठी हवेची गरज असते, परंतु शूजमधून पायांना ही मोकळी हवा मिळत नाही. जर शूज वापरणे फार गरजेचे असेल तर दररोज बदलून वेगवेगळे शूज घाला. पूर्वीचे शूज चांगले कोरडे झाले की मगच त्याला पुन्हा पायांत घाला. यामुळे ओलावा, दमटपणा आणि बॅक्टेरिया साचून राहत नाही. पावसाच्या दमट वातावरणात जर शूज कोरडे होत नसतील तर हेअर ड्रायरचा वापर करुन त्यांना चांगले सुकवून घ्या.