
Stress and Diabetes Connection: तणावामुळे वाढू शकतो डायबिटीजचा धोका; शरीरावर कसा होतो परिणाम?
अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. मात्र, रिकाम्या पोटी कॅफिनयुक्त पेये घेतल्यास रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाचे ठोके वेगाने वाढू शकतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
रात्री अनेक तास झोपल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. अशा वेळी पुरेसे पाणी न प्यायल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.
सकाळी डोळे उघडताच मोबाईलवरील ई-मेल्स, सोशल मीडिया किंवा ऑफिसचे संदेश तपासण्याची सवय अनेकांना असते. यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच मानसिक तणाव वाढून रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. याचा परिणाम हृदयावर आरोग्यावर ऊ शकतो.
व्यस्त दिनचर्येमुळे काही लोक सकाळचा नाश्ता टाळतात. मात्र, पौष्टिक नाश्ता न घेतल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अस्थिर होऊ शकते आणि दीर्घकाळात हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
उठल्याबरोबर कोणतीही तयारी न करता कठोर व्यायाम करणे धोकादायक ठरू शकते. शरीराला हळूहळू सक्रिय करणे गरजेचे असते. सुरुवातीला स्ट्रेचिंग, चालणे किंवा योगासारख्या हलक्या हालचाली करणे अधिक योग्य ठरते.
सकाळी पुरेसे पाणी प्या, संतुलित नाश्ता घ्या, काही वेळ शारीरिक हालचाल करा आणि अनावश्यक तणाव टाळा. नियमित झोप, योग्य आहार आणि सक्रिय जीवनशैलीच्या मदतीने हृदयाचे आरोग्य चांगले राखता येते. छोट्या वाटणाऱ्या सवयींमध्ये बदल केल्यास भविष्यातील हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान; आहारात करा समावेश