
देशात ५ वर्षांत २.९४ लाखांहून अधिक एड्सग्रस्तांचा मृत्यू! महाराष्ट्राची स्थिती सुधारली,पण मुंबईची चिंताजनक
देशभरात राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेकडे नोंदणीकृत असलेल्या आणि एआरटी केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या एचआयव्ही ग्रस्त रुग्णांच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक आणि डोळे उघडणारी आकडेवारी माहिती अधिकारातून समोर आली आहे. गेल्या ५ आर्थिक वर्षात (२०२१ ते २०२६) देशात विविध कारणांमुळे तब्बल २ लाख ९४ हजार एडसग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण कालावधीत एकूण मृत्यूंच्या बाबतीत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असून राज्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी याबाबत राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेकडे माहिती मागवली. त्यानुसार ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.(फोटो सौजन्य – istock)
या संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीत (२०२१-२०२६) झालेल्या एकूण मृत्यूंचा विचार केला तर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे। महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षांत एकूण ३६,६२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जर यामध्ये ‘मुंबई’ची आकडेवारी स्वतंत्र न धरता राज्यासोबत जोडली, तर हा एकूण आकडा ४२,२१६ वर पोहोचतो, जो देशाला हादरवून सोडणारा आहे.
अहवालात मुंबईची आकडेवारी स्वतंत्रपणे मांडण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एचआयव्ही ग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सातत्याने सुरूच आहे. गेल्या ५ वर्षांत मुंबईत एकूण ५,५९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये मृत्यूची संख्या घटत असताना, मुंबईत मात्र गेल्या दोन वर्षांत मृत्यूचा आलेख पुन्हा वाढला आहे, जी अत्यंत चिंतेची बाब आहे.
माहिती अधिकारात ‘नॅको’ने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडे केवळ एचआयव्ही-ए मुळेच किती मृत्यू झाले, याची अचूक वेगळी आकडेवारी उपलब्ध नाही. ही दिलेली आकडेवारी एआरटी केंद्रांमध्ये नोंदणीकृत असलेल्या अशा एचआयव्ही बाधित रुग्णांची आहे, ज्यांचा मृत्यू अपघातासह इतर कोणत्याही आजार किंवा सर्व प्रकारच्या कारणांमुळे झाला आहे.
Blood Donation: रक्तदान करण्यासाठी तुम्ही फिट आहात का? जाणून घ्या आरोग्याचे महत्त्वाचे नियम
तीव्र ताप आणि थंडी वाजणे.
घसा खवखवणे आणि डोकेदुखी.
अंगावर लाल पुरळ उठणे.
अतिशय थकवा जाणवणे.
मान, बगल आणि मांडीच्या जागी लिम्फ नोड्स सुजणे
Ans: HIV हा एक विषाणू आहे जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो. HIV संसर्गाची स्थिती गंभीर झाल्यावर AIDS होऊ शकतो.
Ans: HIV प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित रक्त, वापरलेल्या सुई किंवा संक्रमित आईकडून बाळाकडे (गर्भधारणेदरम्यान/प्रसूतीवेळी/स्तनपानातून) पसरू शकतो.
Ans: होय, योग्य वेळी निदान आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास HIV असलेली व्यक्ती दीर्घकाळ निरोगी जीवन जगू शकते.